शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सासुलाच पळविणाऱ्या, होणाऱ्या जावयाचा रोमँटिक फोटो आला; नवरी भडकली, गिफ्ट दिलेल्या स्मार्टफोनने सूत जुळविले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 14:44 IST

लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते.

मुलीच्या संसाऱ्याच्या स्वप्नांनर स्वार होत मुलीच्याच आईने होणाऱ्या जावयासोबत संसार थाटल्याचा धक्कादायक प्रसंग घडला आहे. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये मुलीच्याच पाठीत खंजीर खुपसणारी आई समोर आली आहे. मुलीला पहायला आला तेव्हाच सासुला जावई आवडला होता. लग्न ठरल्यानंतर मुलगी आणि होणार जावई यांच्यात सुर जुळायला हवेत ते सासूनेच आपले सूर जुळविले. या महिलेचा पती देखील अज्ञात राहिला होता. पळून गेल्यावर त्याचेच नाही तर मुलीचे देखील डोळे पांढरे झाले होते. आता या जावयाचा आणि सासूचा फोटो व्हायरल झाला आहे. 

सासुबाईंनी होणाऱ्या जावयावरच दोरे टाकायला सुरुवात केली होती, या काळात तिने जावयाला नवा कोरा मोबाईल देखील घेऊन दिला होता. देण्या-घेण्याचे असते म्हणून ना मुलीला संशय आला ना तिच्या पतीला. पुढे पती बाहेरगावी कामाला असल्याने सासू जावयासोबत फोनवर बोलत असायची. या दोघांच्याच कधी सूत जुळले हे मुलीला आणि पतीला माहिती झाले. पती जेव्हा घरी आला तेव्हा आपली बायको जावयासोबत बोलतेय हे पाहिले होते, परंतू जावईच आहे, त्यात संशय घेण्यासारखे काय असे म्हणून त्यानेही तिकडे कानाडोळा केला होता. 

इकडे या दोघांनी मुलीच्या लग्नापू्र्वीच पळून जाण्याचा प्लॅन रंगविला होता. पळून गेल्यावर मुलालादेखील धक्का बसला, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते. सासू आणि होणारा जावई कुठे पळून गेले याचा दोघांच्याही घरच्यांना पत्ता नव्हता. अखेर आता त्यांचा फोटो आला आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत आपल्या आईला बघून मुलीने संताप व्यक्त केला आहे. शिवानीच्या लग्नाला ९ दिवस असतानाच ते पळून गेले होते. आईने काहीतरी काम आहे असे सांगितले होते, व बाहेर गेली होती. ती परत आलीच नाही. पतीने विचारपूस सुरु केली तेव्हा समजले की होणारा जावई देखील घरातून गायब झाला आहे. मग जे पुढे आले त्यातून दोन्ही कुटुंबे हादरली होती. आता त्यांचा एकत्र फोटो तो देखील सासूची गुलाबी साडी आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र व डोक्यात सिंदूर पाहून सर्वांना धक्का बसला आहे. 

पळून गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच जावयाचा सासऱ्याला निरोप आला होता, लग्नाला २० वर्षे झाली, तुम्ही तिला खूप त्रास दिला आहे, आता तिला विसरा, असे त्याने या निरोपात म्हटले होते. आता वाच्यता झाल्याने मुलीनेही आई मेली जगली तरी काही फरक पडत नाही, आम्हाला दागिने आणि पैसे परत हवेत, असे म्हटले आहे. 

टॅग्स :marriageलग्नrelationshipरिलेशनशिपUttar Pradeshउत्तर प्रदेश