शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:39 IST

बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे. 

होणारा जावई आणि सासू पळून गेल्याच्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशमधून असेच नातेसंबंधातील संबंध आणि पळून जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे. 

या महिलेच्या मुलाने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा वडील घराबाहेर जायचे तेव्हा ही महिला तिच्या मुलीच्या सासऱ्यांना काही ना काही कारण सांगून घरी बोलवायची. तसेच ते आले की ती आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवून द्यायची, असा आरोप मुलाने केला आहे. आता ते दोघे कारमध्ये बसून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मुलीच्या आईने पोलिसांकडे आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. ममताने सांगितले की ती १५ वर्षांची असताना सुनिलसोबत लग्न झाले होते. सुनिलचे आधी एक लग्न झाले होते.  तो दारुडा होता, म्हणून माझ्या भावाला आणि वडिलांना आवडला नव्हता. त्याची पहिली पत्नी नेपाळची होती. तिचा मृत्यू झाला होता. लग्नानंतर सुनिल मला खूप मारायचा तसेच चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे कंटाळून मी मुलीचा सासरा शैलेंद्रसोबत घर सोडून पळून गेले, असे ममताने म्हटले आहे.

तसेच आपला मुलगा अजून लहान आहे, त्याने सुनिलच्या दबावात माझ्यावर आरोप केले आहेत. ते खोटे आहेत, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

पळून गेलेल्या सासू-जावयाचे पुढे काय झाले...

दरम्यान, सासू आणि होणाऱ्या जावयाला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून पकडले असून सासूने पोलिसांना आपण जायवासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपण घरातून केवळ २०० रुपये घेऊन गेले होते, दागिने, पैशांना हातही लावला नाही, ते खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे या महिलेचा पती तिला घटस्फोट देणार नसल्याचे सांगत आहे. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश