शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 12:39 IST

बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे. 

होणारा जावई आणि सासू पळून गेल्याच्या घटनेनंतर आता उत्तर प्रदेशमधून असेच नातेसंबंधातील संबंध आणि पळून जाण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. बदायूमध्ये मुलीच्या सासऱ्यासोबतच मुलीची आई पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे नातेसंबंधांना धाब्यावर बसवून प्रेमसंबंधांना उत आला आहे. 

या महिलेच्या मुलाने तिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जेव्हा वडील घराबाहेर जायचे तेव्हा ही महिला तिच्या मुलीच्या सासऱ्यांना काही ना काही कारण सांगून घरी बोलवायची. तसेच ते आले की ती आम्हाला दुसऱ्या खोलीत पाठवून द्यायची, असा आरोप मुलाने केला आहे. आता ते दोघे कारमध्ये बसून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

मुलीच्या आईने पोलिसांकडे आपल्या पतीविरोधात तक्रार केली आहे. ममताने सांगितले की ती १५ वर्षांची असताना सुनिलसोबत लग्न झाले होते. सुनिलचे आधी एक लग्न झाले होते.  तो दारुडा होता, म्हणून माझ्या भावाला आणि वडिलांना आवडला नव्हता. त्याची पहिली पत्नी नेपाळची होती. तिचा मृत्यू झाला होता. लग्नानंतर सुनिल मला खूप मारायचा तसेच चारित्र्यावर संशय घ्यायचा. यामुळे कंटाळून मी मुलीचा सासरा शैलेंद्रसोबत घर सोडून पळून गेले, असे ममताने म्हटले आहे.

तसेच आपला मुलगा अजून लहान आहे, त्याने सुनिलच्या दबावात माझ्यावर आरोप केले आहेत. ते खोटे आहेत, असेही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

पळून गेलेल्या सासू-जावयाचे पुढे काय झाले...

दरम्यान, सासू आणि होणाऱ्या जावयाला पोलिसांनी नेपाळ सीमेवरून पकडले असून सासूने पोलिसांना आपण जायवासोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपण घरातून केवळ २०० रुपये घेऊन गेले होते, दागिने, पैशांना हातही लावला नाही, ते खोटे आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे या महिलेचा पती तिला घटस्फोट देणार नसल्याचे सांगत आहे. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश