शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

Unlock4: केंद्राला विचारल्याशिवाय कुठेही संपूर्ण लॉकडाऊन नको; राज्य सरकारांच्या अधिकारांना कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 21:13 IST

Unlock4 guidelines: आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहेत. अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.

नवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनबाबतचे निर्णय केंद्र सरकार एकहाती घेत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत अन्य मुख्यमंत्र्यांचाही हाच सूर होता. यावर केंद्र सरकारने थेटच राज्य सरकारांना इशारा दिला असून कुठेही संपूर्ण लॉकडाऊन करण्यास बंधने लादली आहेत. 

देशभरात मंदिरे सुरु झाली आहेत. जिल्हांतर्गत वाहतूकही सुरु झाली आहे. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यांत यावर बंदी आहे. याआधीचे अनलॉक प्रक्रियेचे निर्णय केंद्र सरकारने राज्यांवर सोपविले होते. मात्र आता केंद्र सरकारने राज्यांना केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय कंटेनमेंट झोनच्या बाहेरील कोणत्याही क्षेत्रात (राज्य / जिल्हा / उपविभाग / शहर / गाव पातळी) संपूर्ण लॉकडाऊन लागू करू नयेत, असे आदेशच काढले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राज्य सरकार स्थानिक पातळीवर तालुका, जिल्हा काही दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेत होते. शिवाय महाराष्ट्रात जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आले होते. यावर आता कंटेनमेंट झोनशिवाय त्या बाहेरील भाग लॉकडाऊन करण्याआधी केंद्र सरकारला विचारावे, अशा सूचनाच राज्यांना करण्यात आल्या आहेत. शिवाय राज्यांतर्गत आणि राज्यात यापुढे प्रवासासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. यावर आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?आज सर्व अधिकार एकाच्या हातात एकवटले जात आहेत. अशावेळी राज्य सरकारांचा अर्थ काय? राज्यांनी केवळ होकारार्थी मान डोलवायची का, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमवेतच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद

Unlock4: ई-पासचे बंधन संपले; देशात लॉकडाऊन 31 सप्टेंबरपर्यंत वाढला

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी