शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्तासंघर्षाचा निकाल आल्यावर एकजूट; विरोधकांचेही महाराष्ट्राकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 12:11 IST

विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार येणार

हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करण्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना सावधपणे पावले टाकत आहेत. त्यांनी सर्वांना स्वीकारार्ह फॉर्म्युला तयार करण्यासाठी यापूर्वी दिल्लीत अरविंद केजरीवाल, कोलकातामध्ये ममता बॅनर्जी व लखनौमध्ये अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. 

जनता दल (यू)च्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, १३ मे रोजीच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर ऐक्याची प्रक्रिया वेग घेऊ शकेल. महाराष्ट्राशी संबंधित सुप्रीम कोर्टाचा फैसलाही १० मेच्या आसपास येण्याची शक्यता आहे. कारण न्या. एम. आर. शाह १४ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि ते या पीठात सहभागी आहेत. काही विरोधी पक्षांनी १९९६ च्या फॉर्म्युल्याचा सल्ला दिला आहे, असे समजते. त्यावेळी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती व नंतर संयुक्त मोर्चा उभारला होता. एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसला तेव्हा राजी करण्यात आले होते. दुसरा फॉर्म्युला २००४ सारखा आहे. त्यावेळी विरोधी पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती व यूपीएने स्थापन केलेले सरकार १० वर्षे चालले होते.

नेमके काय ठरले?नितीशकुमार बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप आघाडीच्या विरोधात आहेत व काँग्रेस केंद्रस्थानी असावा, अशी मते त्यांनी सार्वजनिकरीत्या मांडलेली आहेत. काँग्रेसला चार हात दूर ठेवल्यास अपेक्षित लक्ष्य साध्य करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीमध्ये वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक पक्षाला जागा वाटप करता येईल, असे त्यांना वाटते.विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, विरोधकांची पुढची बैठक पाटणा येथे घेण्यात यावी. तथापि, पश्चिम बंगालमध्ये त्यांना काँग्रेसशी हातमिळवणी करायची नाही.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी