शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मोदींच्या वाराणसीत प्रदूषण वाढलं; देवालाही मास्क लावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 15:19 IST

वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.

ठळक मुद्देवाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे.वाराणसीतील तारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाला मास्क घालण्यात आले आहे.मंदिरातील पुजाऱ्यांनीही मास्क घातले आहे. 

वाराणसी - दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने हवेची गुणवत्ता ही खालावली आहे. दिवाळीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली असून श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. असं असतानाच उत्तर भारताला वायू प्रदूषणाने विळखा घातला आहे. वाराणसीतही मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे आता चक्क देवाच्या मूर्तीलाच मास्क घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका मंदिरात शंकराच्या पिंडीला मास्क लावण्यात आले आहे. तसेच मंदिरातील पुजाऱ्यांनीही मास्क घातले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील तारकेश्वर महादेव मंदिरातील शिवलिंगाला मास्क घालण्यात आले आहे. 'शहरातील हवा प्रदूषित झाली आहे. 'भोले बाबा' यांचं या विषारी हवेपासून रक्षण व्हावं यासाठी त्यांना मास्क लावण्यात आलं आहे. ते सुरक्षित राहिले तर आपण सुरक्षित राहू असा आमचा विश्वास आहे' अशी माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे. 

वाढत्या प्रदूषणाचा फटका हा गंगा नदीच्या आसपासच्या प्रदेशाला बसला आहे. गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांचे आयुष्य सात वर्षांनी घटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने केलेल्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. रिसर्चमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतातील गंगेच्या पठारावरील प्रदूषण हे उर्वरित देशातील प्रदूषणापेक्षा तिप्पट आहे. 1998 ते 2016  दरम्यान गंगेच्या आसपासच्या परिसरातील वायू प्रदूषणात तब्बल 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातील एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटने या भागातील प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. यामध्ये गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या भारतीयांचे आयुष्य सात वर्षांनी घटले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

गंगा स्वच्छता मोहिम सुरू असतानाच प्रदूषणाची पातळी वाढणं ही चिंतेची बाब आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्क्यांहून अधिक जनता या परिसरात राहते. यामध्ये बिहार, चंदिगड, दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होतो. 2016 पर्यंत या प्रदेशातील प्रदूषणात 72 टक्के वाढ झाली आणि त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य 3.4 ते 7.1 वर्षांनी घटले आहे. मात्र राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत ठरवेले लक्ष्य गाठण्यात भारत यशस्वी झाल्यास तसेच स्थायी स्वरूपात 25 टक्के प्रदूषण कमी करण्यातही यश आल्यास हवेचा दर्जा सुधारेल. याचा परिणाम म्हणून भारतीयांचे सरासरी आयुष्य 1.3 वर्षांनी वाढेल असंही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे.  

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषणdelhi pollutionदिल्ली प्रदूषणenvironmentपर्यावरणVaranasiवाराणसी