शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी आणि योगींना मुलं नाहीत, तुमच्याकडून घेऊन ते कुणाला काय देतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 21:23 IST

वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देकृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत - भाजपचा दावाकुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू - भाजपचा इशाराआमच्या नेत्यांमागे कोणीच नाही, ते कुणाला काय देऊन जातील - संजीव बलियान

मुजफ्फरनगर : वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (union minister sanjeev balyan criticized opposition leaders over farm laws)

कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारसह पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांकडून टीका आणि आरोप केले जात आहेत. संजीव बलियान यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. आमच्या नेत्यांमागे कोणीच नाही. ते कुणाला काय देऊन जातील, असे संजीव बलियान यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं

मोदी आणि योगींना मुलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना मुलं-बाळं नाहीत. यामुळे ते कोणाला काय देणार. मात्र, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. भ्रष्टाचार करून आणि खाऊन तुमची पोटं भरली आहेत, अशा शब्दांत संजीव बलियानी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

कृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत

ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, तेच लोकं शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी कायद्यांवरून सतत शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. शेतकर्‍यांना घाबरवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा बलियान यांनी यावेळी केला. 

प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा

कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू

विरोधकांचा कट शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीवर कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू, असा इशारा देत पंतप्रधान मोदी आणि मुख्यंत्री योगी आदित्यनाथ हे गरीब कुटुंबातून आले आहेत. कृषी कायद्यामुळे शेतीतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास संजीव बलियान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश