शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

"मोदी आणि योगींना मुलं नाहीत, तुमच्याकडून घेऊन ते कुणाला काय देतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 21:23 IST

वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ठळक मुद्देकृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत - भाजपचा दावाकुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू - भाजपचा इशाराआमच्या नेत्यांमागे कोणीच नाही, ते कुणाला काय देऊन जातील - संजीव बलियान

मुजफ्फरनगर : वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू आहे. सरकार आणि शेतकरी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्या असून, अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. यातच केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान (Sanjeev Balyan) यांनी येथे एका किसान महापंचायतीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (union minister sanjeev balyan criticized opposition leaders over farm laws)

कृषी कायद्यांवरून केंद्र सरकारसह पंतप्रधाननरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर विरोधकांकडून टीका आणि आरोप केले जात आहेत. संजीव बलियान यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. आमच्या नेत्यांमागे कोणीच नाही. ते कुणाला काय देऊन जातील, असे संजीव बलियान यांनी म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे हनुमान, कोरोना लस ही संजीवनी; भाजप नेत्याची स्तुतीसुमनं

मोदी आणि योगींना मुलं नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांना मुलं-बाळं नाहीत. यामुळे ते कोणाला काय देणार. मात्र, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. भ्रष्टाचार करून आणि खाऊन तुमची पोटं भरली आहेत, अशा शब्दांत संजीव बलियानी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

कृषी कायद्यासंदर्भात अफवा पसरवल्या जात आहेत

ज्यांचे हात रक्ताने माखले आहेत, तेच लोकं शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपले बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कृषी कायद्यांवरून सतत शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण केला जात आहे. शेतकर्‍यांना घाबरवण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या जातील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असा दावा बलियान यांनी यावेळी केला. 

प्रशांत किशोर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा; मिळणार 'इतके' वेतन व 'या' सुविधा

कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू

विरोधकांचा कट शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. शेतकर्‍यांच्या जमिनीवर कुणी वाकड्या नजरेने जरी पाहिले तर त्याचे डोळेच फोडू, असा इशारा देत पंतप्रधान मोदी आणि मुख्यंत्री योगी आदित्यनाथ हे गरीब कुटुंबातून आले आहेत. कृषी कायद्यामुळे शेतीतून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळण्याच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास संजीव बलियान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाyogi adityanathयोगी आदित्यनाथprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेश