शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 22:06 IST

Union Minister Naidu Reaction On Indigo Issue: इंडिगो कंपनीच्या विस्कळीत झालेल्या सेवेमुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे म्हटले जात आहे.

Union Minister Naidu Reaction On Indigo Issue: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोच्या  संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कठोर भूमिका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंडिगोची हजारो उड्डाने रद्द झाली असून, लाखो प्रवाशांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हजारो प्रवाशांना होणारी गैरसोय पाहता केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी स्पष्टपणे सूचित केले आहे की, कोणत्याही प्रकारे सरकार तडजोड करणार नाही. हा मुद्दा केवळ तांत्रिक बिघाडांचा नाही, तर जबाबदारी घेण्याचा आहे. याबाबत सरकार अशी कारवाई करेल की, संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक उदाहरण निर्माण करेल, असा इशारा नायडू यांनी दिला.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अशी कठोर कारवाई केली जाईल की, कोणताही विमान वाहतूक कंपनी या मंत्रालयाला हलक्यात घेण्याचा विचारही करू शकणार नाही. आर्थिक आणि दंडात्मक अशा सर्व प्रकारच्या आणि शक्य असलेल्या कारवाया केल्या जातील. या प्रकरणी एक उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम पावले उचलली जातील. या सगळ्या गोंधळाची संपूर्ण जबाबदारी इंडिगो कंपनीची आहे. नियम आधीच अस्तित्वात असताना ही समस्या ३ डिसेंबर रोजीच का सुरू झाली, असा प्रश्न मंत्री नायडू यांनी यावेळी उपस्थित केला. 

हा प्रकार घडणे खूप आश्चर्यकारक

हा प्रकार घडणे खूप आश्चर्यकारक आहे. इतक्या वर्षांपासून विमान वाहतूक उद्योगातील एक प्रमुख विमान कंपनी आणि गेल्या २० वर्षांपासून सर्वोच्च ऑन-टाइम परफॉर्मन्स देणाऱ्या इंडिगोची अचानक कामगिरी खराब होणे आणि सगळी व्यवस्था विस्कळीत होणे, हे खूप चिंताजनक आहे, असेही नायडू म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. दुसरीकडे, विमान कंपन्यांना रविवार सायंकाळपर्यंत रद्द केलेल्या सर्व उड्डाणांचे तिकिटाच्या रकमेची प्रवाशांना परतफेड करावी. विमान सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय आल्यामुळे अडकलेल्या प्रवाशांचे सामान पुढील दोन दिवसांत पोहोचवावे, असे नागरी उड्डाण मंत्रालयाने निर्देश दिले आहेत. परतफेड प्रक्रियेत कोणताही विलंब किंवा नियमांचे पालन न केल्यास तात्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे. 

दरम्यान, प्रवाशांकडून कोणतेही री-शेड्युल शुल्क आकारले जाणार नाही. इंडिगोला प्रवासी मदत आणि परतावा कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामकाज पूर्णपणे सामान्य होईपर्यंत स्वयंचलित परतावा प्रणाली सुरू राहील. मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, ज्या प्रवाशांचे सामान उड्डाण रद्द झाल्यामुळे किंवा विलंबामुळे मिळाले नाही, त्यांना ते ४८ तासांच्या आत परत करावे लागेल. इंडिगोने शनिवारी ८०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. तर शुक्रवारी १ हजारहून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : No compromise; Strict action ahead: Central government's firm stance on Indigo

Web Summary : Amid Indigo's flight cancellations causing passenger distress, the Civil Aviation Minister warns of strict action. The government will not compromise and aims to set an example for the aviation sector. An inquiry is underway, and financial penalties are possible. Airlines must refund tickets and return luggage promptly.
टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndigoइंडिगोairplaneविमानAirportविमानतळ