शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

"४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर ...", शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:32 IST

Prataprao Jadhav : एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. 

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा खूप चर्चेत होता. यानंतर आता निवडणूक निकाल आणि सरकार स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांनी पीओकेबाबत मोठा दावा केला आहे. एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. 

रविवारी (दि.७) एका कार्यक्रमात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव बोलत होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएने ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात सामील करून घेणे आणि १९६२ मध्ये चीनने ताब्यात घेतलेली जमीन परत घेणे शक्य झाले असते, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. तसेच,  पीओके भारताचाअविभाज्य भाग असूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पीओकेचा भारताच्या नकाशात समावेश करण्याचे स्वप्न खूप दिवसांपासून पाहत आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. ते म्हणाले की, १९६२ च्या युद्धात चीनने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. तसेच, ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या तर दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले असते, असा दावाही खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.

विरोधकांवर खोटा प्रचार केल्याचा आरोपदरम्यान, विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, असा खोटा प्रचार केल्याचा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तसेच, संविधान बदलता येणार नाही. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी राज्यघटनेच्या विध्वंसाचे वास्तविक उदाहरण असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवPOK - pak occupied kashmirपीओकेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना