शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर ...", शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 13:32 IST

Prataprao Jadhav : एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. 

नवी दिल्ली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा खूप चर्चेत होता. यानंतर आता निवडणूक निकाल आणि सरकार स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री शिवसेना (शिंदे गट) खासदार प्रतापराव जाधव यांनी पीओकेबाबत मोठा दावा केला आहे. एनडीएने लोकसभेत ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पीओके परत घेणे शक्य झाले असते, असे प्रतापराव जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले. 

रविवारी (दि.७) एका कार्यक्रमात बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव बोलत होते. लोकसभा निवडणुकीत एनडीएने ४०० हून अधिक जागा जिंकल्या असत्या तर पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात सामील करून घेणे आणि १९६२ मध्ये चीनने ताब्यात घेतलेली जमीन परत घेणे शक्य झाले असते, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले. तसेच,  पीओके भारताचाअविभाज्य भाग असूनही पाकिस्तानच्या ताब्यात आहे, असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पीओकेचा भारताच्या नकाशात समावेश करण्याचे स्वप्न खूप दिवसांपासून पाहत आहेत, असा दावा खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. ते म्हणाले की, १९६२ च्या युद्धात चीनने ताब्यात घेतलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. तसेच, ४०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या तर दोन तृतीयांश बहुमत मिळू शकले असते, असा दावाही खासदार प्रतापराव जाधव यांनी केला.

विरोधकांवर खोटा प्रचार केल्याचा आरोपदरम्यान, विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल, असा खोटा प्रचार केल्याचा आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला. तसेच, संविधान बदलता येणार नाही. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी राज्यघटनेच्या विध्वंसाचे वास्तविक उदाहरण असल्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Prataprao Jadhavप्रतावराव जाधवPOK - pak occupied kashmirपीओकेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना