शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

शेतकऱ्यांचे आंदोलन; मोदी सरकारचा मोठा निर्णय, ऊस खरेदीचा दर ८ टक्क्यांनी वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 23:57 IST

Central Govt Cabinet Decision News: एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र झाले असताना, दुसरीकडे केंद्र सरकारने ऊस खरेदीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Central Govt Cabinet Decision News:  पुढील पाच वर्षांसाठी डाळी, मका आणि कापूस पिकांची सरकारी संस्थांकडून किमान आधारभूत किमतीवर खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला. हा प्रस्ताव फेटाळत २३ पिकांना हमीभाव द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तीव्र केले आहे. यातच आता ऊस खरेदीत वाढीव किंमत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ऊस खरेदीच्या दरात ८ टक्के वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ऊस खरेदीचा दर प्रतिक्विंटल ३१५ रुपयांवरून आता ३४० रुपये करण्यात आला आहे. ऊसाच्या भावात प्रतिक्विंटल २५ रुपयांची वाढ देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने गेल्या १० वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम केले आहे. २०१४ पूर्वी खते मिळण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत होते. त्यावेळी ऊसाचा भाव रास्त नव्हता. दोन वर्षे वाट पाहावी लागली. मोदी सरकारची या बाबतीतील कामगिरी उत्तम राहिली आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २०१९-२० मध्ये ७५,८५४ कोटी रुपये मिळाले. २०२०-२१ मध्ये ९३,०११ कोटी रुपये मिळाले आहेत. २०२१-२२ मध्ये शेतकऱ्यांना १.२८ लाख कोटी रुपये मिळाले आहेत. २०२२-२३ मध्ये १.९५ लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. हे पैसे थेट त्याच्या खात्यात पाठवले गेले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे. 

सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पाऊल उचलले. जलदगती न्यायालये निर्माण केली. कायदे केले. आता २०२५-२६ पर्यंत एक योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ११२ ची सेवा चोवीस तास करण्यात येणार आहे. वैज्ञानिक आणि कालबद्ध तपासासाठी ६ सायबर फॉरेन्सिक सायन्स लॅब तयार करणार आहेत. पुणे, चंदीगड, दिल्ली, भोपाळ येथे या लॅब असतील. नॅशनल फॉरेन्सिक डेटा सेंटरचीही स्थापना करण्यात येणार आहे. सायबर फॉरेन्सिकची क्षमता वाढवण्यासाठी राज्यांना उपकरणे आणि प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहितीही अनुराग ठाकूर यांनी दिली.

दरम्यान, महिला आणि मुलांवरील गुन्हे रोखण्यासाठी दरवर्षी ५ हजार सैनिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी २०२५-२६ पर्यंत १,१७९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच केंद्र सरकारने अंतराळ क्षेत्रात एफडीआयला मान्यता दिली आहे. अंतराळ क्षेत्रात देशाने अभूतपूर्व यश मिळवले आहे. चांद्रयान मोहिमेने जे केले ते जगातील कोणताही देश करू शकला नाही. आता एंड-टू-एंड मॅन्युफॅक्चरिंग, सॅटेलाइट पुरवठा आणि ऑपरेशन, ग्राऊंड सेगमेंट आणि यूजर सेगमेंट यांमध्ये ७४ टक्क्यांपर्यंत एफडीआयला परवानगी दिली जाईल. प्रक्षेपण वाहने आणि स्पेस पोर्ट्स ३९ टक्के एफडीआयला परवानगी देण्यात आली आहे, असेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारsugarcaneऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती