शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

Video: देश के गद्दारो को...गोली मारो ***; केंद्रीय मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानावर विरोधक संतप्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 09:10 IST

अलीकडेच भाजप नेत्याने दिल्लीतील लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत असल्याचे म्हटलं होतं

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात देशभरात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शन होत असताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे वादग्रस्त विधान समोर आलं आहे. निवडणुकीच्या रॅलीमध्ये भाषण करताना अनुराग ठाकूर यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप विरोधकांनी लावला आहे. अनुराग ठाकूर मंचावरुन भाषण करताना देश के गद्दारो को अशी घोषणा देताना लोकांमधून गोली मारो .... को अशा प्रतिघोषणा देण्यात येत होत्या. 

अनुराग ठाकूर यांच्या विधानानंतर सोशल मीडियावर हॅशटॅग गद्दार असा ट्रेंड सुरु आहे. याबाबत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ट्विट करुन अनुराग ठाकूर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकांना भडकवण्याचे काम करणाऱ्यांना जेलमध्ये असायला हवं त्याऐवजी अनुराग हे मोदी सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. 

याबाबत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपावर आरोप करत अनुराग ठाकूर यांच्या विधानाबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावरुन दिल्ली मुख्य निवडणूक अधिकारी यांनी अनुराग ठाकूर यांच्या कार्यक्रमाचा रिपोर्ट मागवला आहे. काँग्रेसकडून अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

रिठाला येथील भाजपा उमेदवार मनिष चौधरी यांच्या समर्थनार्थ मंत्री अनुराग ठाकूर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाहीनबाग येथे सुरु असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. यामध्ये देशविरोधी घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोप भाजपाने केला. तर देशातील शांतता बिघडवण्यासाठी भाजपा नेते काम करतायेत असा आरोप काँग्रेसचे नेते किर्ती आझाद यांनी केला आहे. 

अलीकडेच भाजप नेत्याने दिल्लीतील लढत म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत असल्याचे म्हटलं होतं. त्यामुळे इतर राज्यातील निवडणुकांप्रमाणेच दिल्ली विधानसभा निवडणुकीतही पाकिस्तानची एन्ट्री झाली. याआधी 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत देखील पाकिस्तानला अशाचप्रकारे केंद्रस्थानी आणले गेले होते. त्यावेळी अशा प्रकारचे वक्तव्य भाजपकडूनच करण्यात आले होते. त्यावेळी भाजपच्या अध्यक्षपदी अमित शाह होते. बिहारमध्ये आयोजित एका सभेत शाह म्हणाले होते की, बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानात फटके फुटतील. त्यावेळी निवडणुकीचा निकाल भाजपला अनुकूल लागला नाही. मात्र शाह यांच्या वक्तव्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल कऱण्यात आली होती. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस