शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

“पुढील ३० ते ४० वर्षांपर्यंत राहणार भाजप युग,” राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत अमित शाहंचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 16:13 IST

घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप असल्याचं शाह यांचं वक्तव्य.

“पुढील ३० ते ४० वर्षे भाजपचा काळ असेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल. घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप आहे, जो देशासमोरील समस्यांना कारणीभूत आहे,” असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अमित शाह यांनी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर भाष्य केलं. 

तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजप कौटुंबिक राजवट संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल, असे अमित शाह म्हणाले. २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप या राज्यांमध्ये मात्र सत्तेत नाही.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिकसर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं शाह म्हणाले. यामध्ये दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाफीया जाफरी यांची याचिका न्यायालयानं फेटाळली होती. याचिकेत गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ लोकांना एसआयटीनं दिलेल्या क्लिन चीटला आव्हान देण्यात आलं होतं. मोदी यांनी दंगलीमध्ये आपल्या कथित भूमिकेबाबत एसआयटी तपासाचा सामना केला होता आणि संविधानावर आपला विश्वास कायम ठेवला होता असं शाह म्हणाले.

काँग्रेस हा कुटुंबाचा पक्ष झाला आहे. त्यांचे काही सदस्य पक्षाच्या आतच लोकशाहीसाठी लढत आहे. गांधी कुटुंब अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होऊ देत नाही. त्यांना पक्षावरील आपलं नियंत्रण गमावण्याची भिती आहे. विरोधक असंतुष्ट आहेत आणि सरकार जे काही चांगलं करतं, त्याचा ते विरोधच करत असतात, असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा