शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

Coronavirus: केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय; कोविड उपचार घेण्यासाठी रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं बंधनकारक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 16:48 IST

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.

ठळक मुद्देकोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे.केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत

नवी दिल्ली – कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना कोविड फॅसिलिटीत दाखल करण्यासाठीच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. आता कोविड आरोग्य सुविधेसाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे बंधनकारक नाही. रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन सरकारने हे पाऊल उचललं आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संशयित कोरोना संक्रमित रुग्णांवर तातडीने उपचाराला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत कोविड सुविधेत दाखल होण्यासाठी केवळ कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक होतं. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयासह राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश दिले आहेत. या आदेशात म्हटलंय की, ज्या रुग्णांना कोविडचा संशय वाटतो अशांना CCC, DCHC या संशयित वार्डात दाखल करून घ्यावं. कोणत्याही रुग्णांना सेवा देण्यपासून रोखलं जाऊ शकत नाही असं केंद्राने सांगितले.

या सेवांमध्ये ऑक्सिजन अथवा आवश्यक औषधांचाही समावेश आहे. मग भलेही रुग्ण दुसऱ्या शहरातील का असू नये. कोणाकडेही ओळखपत्र नसल्या कारणाने त्याला उपचारासाठी दाखल होण्यापासून नकार दिला जाऊ शकत नाही. हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्याला भरती केलं जाऊ शकतं. मात्र ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची गरज नाही, विनाकारण बेड अडवून राहिलेत याची खातरजमा करून घ्यावी. याशिवाय रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत संबंधित पॉलिसीनुसार सोडावं. आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या प्रधान सचिवांना ३ दिवसांच्या आत या आदेशाचे पालन आणि परिपत्रक काढण्याची सूचना दिली आहे.

गेल्या २४ तासांत १८ लाखांहून अधिक चाचण्या

ग्रूप ऑफ मिनिस्टर्सच्या (GoM) २५ व्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन संबोधित करत होते. "देशात सलग तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत ४ लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४,०१,०७८ नवे रुग्ण आढळले आहेत. पण दुसरीकडे सकारात्मक बाब अशी की गेल्या २४ तासांत ३ लाख १८ हजार ६०९ रुग्ण कोरोनावर मात करुन सुखरूप घरी देखील पोहोचले आहेत. आता देशाची एका दिवसाची चाचण्यांची क्षमता २५ लाख इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात १८ लाख ८ हजार ३४४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत", असं डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. देशात गेल्या २४ तासांत ४ हजार १८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा एकूण मृत्यूंचा आकडा २ लाख ३८ हजार २७० वर पोहोचला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या २ कोटी १८ लाख ९२ हजार ६७६ इतकी झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकार