शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जम्मू काश्मीरमध्ये ओबीसी, एससी-एसटीसह सवर्ण आरक्षण होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 22:47 IST

जम्मू काश्मीरबद्दल मोदी सरकारचे दोन महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: देशभरात लागू असलेलं आरक्षण जम्मू-काश्मीरमध्येही लागू करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. विशेष म्हणजे या आरक्षणाचा लाभ पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांनादेखील मिळणार आहे. याशिवाय 1954 च्या राष्ट्रपती आदेशात बदल करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला. यामुळे कलम 370 शिथिल होणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटलींनी दिली. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत जम्मू काश्मीरबद्दल दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचं आल्याचं जेटलींनी सांगितलं. 

आज केंद्रीय कॅबिनेटनं 1954 च्या राष्ट्रपती आदेशात बदल केला. याच आदेशामुळे जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू आहे. राष्ट्रपती आदेशात बदल केल्यानं कलम 370 शिथिल झाल्याची माहिती जेटली यांनी दिली. याशिवाय राज्यपालांच्या स्वीकृतीनं जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमधील जनतेला ओबीसी, एससी-एसटीसह सवर्ण आरक्षणाचा लाभ मिळेल. हे आरक्षण आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतच्या जनतेसाठी लागू असेल, असं जेटली म्हणाले. त्यामुळे या आरक्षणाचा लाभ पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेलाही मिळणार आहे.केंद्रीय कॅबिनेटनं जम्मू-काश्मीर आरक्षण (सुधारणा) अध्यादेश 2019 ला मंजरी दिली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळेल. मोदी सरकारनं गेल्याच महिन्यात गेल्याच महिन्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. हे आरक्षणदेखील आता जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण मिळेल.

टॅग्स :reservationआरक्षणSC STअनुसूचित जाती जमातीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीArun Jaitleyअरूण जेटली