शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

budget 2022: शेती होणार हायटेक, ड्रोनचा शेतीसाठी वापर; रसायनविरहित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 06:14 IST

Union Budget 2022 Agriculture Sector and Farmers Welfare : रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर देतानाच ‘किसान ड्रोन’चा वापर करून, तसेच डिजीटल आणि अत्याधुनिक सेवांचा देशभरातील शेतीसाठी वापर करून शेतीला ‘हायटेक’ बनविण्यावर भर देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.

रसायनमुक्त नैसर्गिक शेतीवर भर देतानाच ‘किसान ड्रोन’चा वापर करून, तसेच डिजीटल आणि अत्याधुनिक सेवांचा देशभरातील शेतीसाठी वापर करून शेतीला ‘हायटेक’ बनविण्यावर भर देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले. या अर्थसंकल्पात कृषीसाठी ४.५ टक्के वाढ करून १ लाख ३२ हजार ५१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य, पशुसंवर्धन, दुग्धप्रक्रियेसाठी ६,४०७.३१ कोटी तर अन्नप्रक्रिया उद्योगासाठी २,९४१.९९ कोटींची तरतूद केली आहे. वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गहू आणि भात (पॅडी)च्या किमान आधारभूत किंमत देण्यासाठी या अर्थसंकल्पात सन २०२२-२३ या वर्षासाठी २ लाख ३७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीतून १२०८ लाख टन धान्य खरेदी केले जाईल. त्याचा लाभ १६३ लाख शेतकऱ्यांना मिळेल. त्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होईल. या अर्थसंकल्पात साखर उद्योगासाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. 

तेलबिया उत्पादनावर भर खाद्यतेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तेलबिया उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्यात येईल. नैसर्गिक शेतीची योजना, गंगा किनाऱ्यावरील ५ किलोमीटर परिसरात पहिल्या टप्प्यात राबविली जाईल.

‘किसान ड्रोन’चा वापरशेतीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब करून पिकांचा आढावा घेण्यात येईल. शेतीवर कीटकनाशके फवारण्यात येतील, जमिनीसंदर्भातील कागदपत्रांचे डिजिटाजेशन करण्यात येईल. याशिवाय नाबार्डच्या साह्याने ग्रामीण उद्योजक आणि कृषी स्टार्टअपसाठी अर्थसाह्य केले जाईल. 

कृषी क्षेत्रात पीपीपी मॉडेलकृषी क्षेत्रात खासगी आणि सरकारी सहभागातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. या सहभागाद्वारे २०२२-२३ या वर्षात देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सेवा पुरविल्या जातील. 

राकेश टिकैत, प्रवक्ते, भारतीय किसान युनियनयंदाचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या काहीही फायद्याचा नाही. तो केवळ कागदोपत्री चांगला वाटतो. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या खिशात काहीही पडणार नाही. एमएसपी कायद्यामुळे कमी किमतीत मालाची खरेदी बंद होईल, असे म्हटले होते. मात्र याचा फायदा व्यापाऱ्यांना होत असून ते कमी किमतीत मालाची खरेदी करून एमएसपीमध्ये अधिक किंमतीने विक्री करत आहेत.

राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी कृषी सुधारणांच्या नावाखाली स्वप्नांचा मनोरा बांधला असला तरी प्रत्यक्षात अर्थसंकल्पात काहीच नाही. ‘कृषी’मध्ये डिजिटल क्रांती करण्याची भाषा केली जाते. मात्र, दुसऱ्या बाजूला कृषी महाविद्यालयांची अवस्था वाईट आहेे. तिथे एकही संशोधन होत नाही, मग डिजीटल क्रांती होणार कशी? केवळ सोशल मीडियावर गव्हाची शेती पिकवता येत नाही.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022agricultureशेतीFarmerशेतकरीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन