शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Union Budget 2019: महिलांसाठी ‘इल्ले’, ‘नारी टु नारायणी’ असे कोरडे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 02:33 IST

हर घर जल’ ही घोषणाही डोक्यावरून पाण्याचे हंडे वहावे लागणा-या महिलांना आशेचा किरण दाखवणारी आहे.

देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्षेत्रात बरोबरीचा वाटा उचलणाऱ्या स्त्रिया ‘विकासाच्या भागीदार’ आहेत, असा गौरवपूर्ण उल्लेख करणाºया अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रत्यक्षात मात्र सोने महाग करून, पेट्रोलवरचा अधिभार वाढवून ‘गृहिणीं’ची नाराजीच ओढवून घेतली आहे. गेल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारच्या विकास योजनांमधून शहरी स्त्रियांचा मोठा गट दुर्लक्षित राहिला होता. याही वर्षी ती परिस्थिती बदललेली नाही. महिला-बाल कल्याणासाठीच्या सकल योजनांसाठीच्या एकत्रित तरतुदीचा आकडाही अर्थमंत्र्यांच्या भाषणातून गायब होता.‘गाव, गरीब आणि शेतकरी’ असा केंद्रबिंदू असलेल्या या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील गरिबांसाठी घरे, वीजजोडण्या, शौचालये, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन यावर भर आहे; त्याचा लाभ अंतिमत: महिलांना होईल. ‘हर घर जल’ ही घोषणाही डोक्यावरून पाण्याचे हंडे वहावे लागणा-या महिलांना आशेचा किरण दाखवणारी आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांना चालना देणे आणि बचत गटसदस्यांना सहजी भांडवलाची उपलब्धता या दोन महत्त्वाच्या तरतुदी! मात्र, गर्दीने बजबजलेल्या शहरांमध्ये सुरक्षित वाहतुकीपासून पाळणाघरासारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी प्रतीक्षेत असलेल्या शहरी स्त्रियांना सुविधा देणे सोडाच; त्यांचा महिन्याचा घरखर्च वाढेल, अशीच बातमी निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढावा, याकरिताच्या उपाययोजना सुचवण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा मात्र सीतारामन यांनी केली आहे.‘पक्षी एका पंखाने उडू शकत नाही,’ याचे भान देणाºया स्वामी विवेकानंदांचा उल्लेख अर्थमंत्र्यांच्या भाषणात होता, हे विशेष!

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Womenमहिला