शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ पूर्वी समान नागरी, लोकसंख्या नियंत्रय कायदा लागू करा; बाबा रामदेव यांची मोदी सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:41 IST

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे. सरकारने या दिशेने लवकरात लवकर प्रभावी पावले उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, अशी मागणी रामदेव बाबा यांनी केली.

आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर उभारले जावे, हे जनतेचे स्वप्न असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. देशातील कलम-३७० ही हटवण्यात आले. आता फक्त दोनच कामे उरली आहेत.

मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा; सुरतच्या न्यायालयाने निकाल सुनावला

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचे कामही २०२४ पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. नऊ दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी योगगुरू रामदेव यांनी ही मागणी केली. योगगुरू रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या सहवासात पतंजली संन्यासाश्रमाजवळील ऋषीग्राममध्ये नऊ दिवसीय संन्यास दीक्षा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी योगगुरू रामदेव म्हणाले की, राम मंदिरासोबतच या देशाचे राष्ट्रीय मंदिरही उभारले पाहिजे. त्याचबरोबर चारित्र्य घडवायला हवे, व्यक्तिमत्व घडवले पाहिजे आणि दैवी नेतृत्व घडवले पाहिजे. ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम सुरू आहे.

हे सनातनच्या प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे कार्य आहे. जे रामविरोधी, देशद्रोही आहेत, त्यांच्यात खळबळ उडाली आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले. राम मंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, युगाचा धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले.

संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचे अनुष्ठान केले जाईल. सर्व तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत, असंही रामदेव बाबा म्हणाले.

'ऋषींचे वंशज दीक्षा महोत्सवासाठी तयार केले जात आहेत. हे संन्यासी ऋषींचे प्रतिनिधी आणि उत्तराधिकारी असतील. हे संन्यासी सनातन धर्माचा झेंडा जगात फडकवतील. हे संन्यासी पतंजलीचे उत्तराधिकारी देखील होतील, असंही रामदेव बाबा म्हणाले. 

ऋषीग्राममध्ये ६० तरुण आणि ४० तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर उत्सवात ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा दिली जाणार आहे. आचार्य बालकृष्ण या ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा देणार आहेत. संन्यास दीक्षा महोत्सवात सर्व समाजातील तरुण-तरुणींना सुरुवात केली जात आहे, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदी