शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

२०२४ पूर्वी समान नागरी, लोकसंख्या नियंत्रय कायदा लागू करा; बाबा रामदेव यांची मोदी सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:41 IST

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे. सरकारने या दिशेने लवकरात लवकर प्रभावी पावले उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, अशी मागणी रामदेव बाबा यांनी केली.

आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर उभारले जावे, हे जनतेचे स्वप्न असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. देशातील कलम-३७० ही हटवण्यात आले. आता फक्त दोनच कामे उरली आहेत.

मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा; सुरतच्या न्यायालयाने निकाल सुनावला

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचे कामही २०२४ पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. नऊ दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी योगगुरू रामदेव यांनी ही मागणी केली. योगगुरू रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या सहवासात पतंजली संन्यासाश्रमाजवळील ऋषीग्राममध्ये नऊ दिवसीय संन्यास दीक्षा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी योगगुरू रामदेव म्हणाले की, राम मंदिरासोबतच या देशाचे राष्ट्रीय मंदिरही उभारले पाहिजे. त्याचबरोबर चारित्र्य घडवायला हवे, व्यक्तिमत्व घडवले पाहिजे आणि दैवी नेतृत्व घडवले पाहिजे. ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम सुरू आहे.

हे सनातनच्या प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे कार्य आहे. जे रामविरोधी, देशद्रोही आहेत, त्यांच्यात खळबळ उडाली आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले. राम मंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, युगाचा धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले.

संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचे अनुष्ठान केले जाईल. सर्व तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत, असंही रामदेव बाबा म्हणाले.

'ऋषींचे वंशज दीक्षा महोत्सवासाठी तयार केले जात आहेत. हे संन्यासी ऋषींचे प्रतिनिधी आणि उत्तराधिकारी असतील. हे संन्यासी सनातन धर्माचा झेंडा जगात फडकवतील. हे संन्यासी पतंजलीचे उत्तराधिकारी देखील होतील, असंही रामदेव बाबा म्हणाले. 

ऋषीग्राममध्ये ६० तरुण आणि ४० तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर उत्सवात ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा दिली जाणार आहे. आचार्य बालकृष्ण या ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा देणार आहेत. संन्यास दीक्षा महोत्सवात सर्व समाजातील तरुण-तरुणींना सुरुवात केली जात आहे, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदी