शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

२०२४ पूर्वी समान नागरी, लोकसंख्या नियंत्रय कायदा लागू करा; बाबा रामदेव यांची मोदी सरकारला मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 11:41 IST

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांनी मोदी सरकारकडे देशात समान नागरी संहिता आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी केली आहे. सरकारने या दिशेने लवकरात लवकर प्रभावी पावले उचलावीत आणि २०२४ पूर्वी हा कायदा लागू करावा, अशी मागणी रामदेव बाबा यांनी केली.

आपल्या डोळ्यासमोर भव्य राम मंदिर उभारले जावे, हे जनतेचे स्वप्न असल्याचेही रामदेव बाबा म्हणाले. पुढील वर्षी जानेवारीत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे ही आनंदाची बाब आहे. देशातील कलम-३७० ही हटवण्यात आले. आता फक्त दोनच कामे उरली आहेत.

मोदी आडनाव अवमानावरून राहुल गांधी दोषी, दोन वर्षांची शिक्षा; सुरतच्या न्यायालयाने निकाल सुनावला

समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवण्याचे कामही २०२४ पूर्वी होईल, अशी सरकारकडून अपेक्षा आहे. नऊ दिवस चालणाऱ्या संन्यास दीक्षा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी योगगुरू रामदेव यांनी ही मागणी केली. योगगुरू रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या सहवासात पतंजली संन्यासाश्रमाजवळील ऋषीग्राममध्ये नऊ दिवसीय संन्यास दीक्षा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी योगगुरू रामदेव म्हणाले की, राम मंदिरासोबतच या देशाचे राष्ट्रीय मंदिरही उभारले पाहिजे. त्याचबरोबर चारित्र्य घडवायला हवे, व्यक्तिमत्व घडवले पाहिजे आणि दैवी नेतृत्व घडवले पाहिजे. ज्या आकांक्षेने लाखो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्याचे काम सुरू आहे.

हे सनातनच्या प्रतिष्ठेचे आणि अभिमानाचे कार्य आहे. जे रामविरोधी, देशद्रोही आहेत, त्यांच्यात खळबळ उडाली आहे, असंही बाबा रामदेव म्हणाले. राम मंदिर त्याच्या जागतिक प्रतिष्ठेसह पूर्णत्व प्राप्त करेल. पतंजलीमध्ये सनातन धर्माला विश्वधर्म म्हणून, युगाचा धर्म म्हणून स्थापित करण्यासाठी संन्याशांची दीक्षा घेतली जात आहे, असंही रामदेव बाबा म्हणाले.

संन्यास घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी ऋषीग्रामची स्थापना करण्यात आली आहे. नऊ दिवस दीक्षा घेणारे तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये उपवास आणि पूजा करतील. चारही वेदांचे अनुष्ठान केले जाईल. सर्व तरुण-तरुणी ऋषीग्राममध्ये नऊ दिवस राहणार आहेत, असंही रामदेव बाबा म्हणाले.

'ऋषींचे वंशज दीक्षा महोत्सवासाठी तयार केले जात आहेत. हे संन्यासी ऋषींचे प्रतिनिधी आणि उत्तराधिकारी असतील. हे संन्यासी सनातन धर्माचा झेंडा जगात फडकवतील. हे संन्यासी पतंजलीचे उत्तराधिकारी देखील होतील, असंही रामदेव बाबा म्हणाले. 

ऋषीग्राममध्ये ६० तरुण आणि ४० तरुणी संन्यासाची दीक्षा घेणार आहेत. स्वामी रामदेव सर्वांना संन्यास दीक्षा देणार आहेत. त्याचबरोबर उत्सवात ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा दिली जाणार आहे. आचार्य बालकृष्ण या ५०० तरुण-तरुणींना ब्रह्मचर्य दीक्षा देणार आहेत. संन्यास दीक्षा महोत्सवात सर्व समाजातील तरुण-तरुणींना सुरुवात केली जात आहे, अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाNarendra Modiनरेंद्र मोदी