शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

"ध्रुवीकरणासाठी यूसीसी नको! फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा समान नागरी कायदा अविभाज्य भाग"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 11:24 IST

Congress Stance on UCC: उत्तराखंड सरकारने लागू केलेला समान नागरी कायदा हा एक चुकीचा मसुदा असून, तो हस्तक्षेप करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला.

नवी दिल्ली : देशात कायमचे ध्रुवीकरण करण्यासाठी समान नागरी कायद्याचा (यूसीसी) राजकीय साधन म्हणून वापर करणे चुकीचे असल्याचा दावा गुरुवारी काँग्रेसने केला. उत्तराखंड राज्यात यूसीसी लागू होणे व गुजरात सरकारने त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी भाजप सरकारवर टीका केली.

फूट पाडणाऱ्या अजेंड्याचा अविभाज्य भाग म्हणून उत्तराखंडसारख्या राज्यात भाजपकडून जबरदस्तीने यूसीसी लागू करण्यात आला. त्यानंतर गुजरात सरकारने हा कायदा लागू करण्यासाठी एक समिती स्थापन केल्याची घोषणा केली. मात्र, अनुसूचित जमातींना या कायद्यातून सूट दिल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. 

केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या २१ व्या विधी आयोगाने यूसीसीसंदर्भात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८२ पानांचा 'कुटुंब कायद्यातील सुधारणांसंदर्भात सल्लापत्र' सादर केले होते. सध्याच्या परिस्थितीत या कायद्याची आवश्यकता व गरज नसल्याचा सल्ला आयोगाने दिला होता.

कलम ४४ स्वीकारताना ही कल्पना नसेल

उत्तराखंड सरकारने लागू केलेला समान नागरी कायदा हा एक चुकीचा मसुदा असून, तो हस्तक्षेप करणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला.

भविष्यात राज्यांच्या विधानसभेद्वारे वेगवेगळ्या समान नागरी संहितेला मंजुरी दिली जाईल, अशी कल्पनादेखील संविधान सभेने भारतीय संविधानातील कलम ४४ स्वीकारताना केली नसेल, असे ते म्हणाले.

दरम्यान, २२ व्या विधी आयोगाने या संदर्भातील अहवाल सादर करण्यापूर्वीच ते ३१ ऑगस्ट २०२४ रोजी विसर्जित करण्यात आले. दरम्यान, केंद्र सरकारने ३ डिसेंबर २०२४ रोजी २३ व्या विधी आयोगाची घोषणा केली. मात्र, या आयोगाची रचना केंद्र सरकारने अद्याप सार्वजनिक केलेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :Uniform Civil Codeसमान नागरी कायदाBJPभाजपाcongressकाँग्रेसUttarakhandउत्तराखंडNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी