शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

...तर मोदींचा वारासणीत धुव्वा उडेल- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 19:29 IST

राहुल गांधींचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद

सर्व विरोधक एकत्र आल्यास लोकसभा निवडणूक जिंकणे तर सोडाच, पंतप्रधान मोदींना त्यांची वाराणसीमधील जागादेखील राखता येणार नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. बंगळुरुत पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना राहुल यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीवर विश्वास व्यक्त केला. '2019 ची लोकसभा निवडणूक जिंकणे तर दूरच राहिले, काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आल्यास, पंतप्रधानांना वाराणसीची जागाही गमवावी लागेल,' असे राहुल म्हणाले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी तिसऱ्या आघाडीची शक्यता फेटाळून लावली. 'खरे सांगायचे झाल्यास भाजप पुढील निवडणूक जिंकेल, असे मला वाटत नाही. त्यामुळे 2019 मध्ये परिस्थिती सामान्य होईल, असे मला वाटते,' असे राहुल गांधी यांनी म्हटले. दलितांच्या वाढत्या आक्रोशाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे उत्तर दिले. 'दोन मुख्य मुद्द आहेत. विरोधी पक्षांची एकजूट एका विशिष्ट उंचीवर पोहोचली की त्यांना (भाजपला) निवडणूक जिंकणे अवघड होईल. सध्या विरोधी पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपचा पराभव निश्चित आहे,' असेही राहुल यांनी म्हटले. उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडूमध्ये विरोधी पक्ष एकत्र येत असल्याकडे राहुल गांधींनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अशा परिस्थितीत ते (भाजप) कुठून जागा जिंकणार? आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाबमध्ये आम्ही भाजपला पराभूत करु,' असे राहुल यांनी म्हटले. कर्नाटकमध्ये 12 मे रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राहुल गांधी सहाव्यांदा कर्नाटकच्या दौऱ्यावर आले आहेत. विरोधी पक्ष एकत्र येत असले तरी, या पक्षांच्या नेत्यांच्या मनात नेतृत्त्व करण्याची इच्छा आहे. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबद्दलही राहुल गांधी यांना छेडण्यात आले. त्यावर बोलताना, आम्ही यातून निश्चित मार्ग काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'आम्ही यावर तोडगा काढू. माणसांना कसे सांभाळून घ्यायचे, हे काँग्रेसला माहित आहे. आम्हाला कशाचाही अहंकार नाही. आम्ही लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत नाही. त्यामुळे या परिस्थितीतून नक्कीच मार्ग काढला जाईल,' असे राहुल यांनी म्हटले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी