शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:59 IST

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून मोदी आणि भाजपा सरकारविरुद्ध मोहिम राबविण्यात येत आहे. मोदी सरकारकडून पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला उघडं पाडण्याचं काम सीपीएम करेल, असा ठरावच सीपीएमच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या दहशतवादी घटनांची आकडेवारीच दिली आहे. 

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे. मात्र, भाजपाकडून या एकतेला तडा देण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी भाजपा या मतभेद निर्माण करत आहे. भारतीय विरुद्ध मुस्लीम आणि भारतीय विरुद्ध काश्मिरी, असा वाद पेटविण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या एका समितीच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे. तर नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे. सन 2014 ते 2018 या कालावधीत प्रत्येक महिन्याला 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं या आकडेवारीवरुन समोर आल्याचं येचुरी यांनी सांगितलं आहे. 

तसेच काश्मिरी तरुणांचे दहशतवादी संघटनांकडे वळण्याचे प्रमाणही याच काळात वाढले आहे. सन 2013 मध्ये हे प्रमाण 16 असे होते, पण आता 2018 मध्ये हे प्रमाण 164 पर्यंत पोहोचले आहे. भाजपाकडून जाणीवपूर्वक कट्टर राष्ट्रवादाला खतपाणी घालण्यात येत असून गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील सन 2018-19 चा जीडीपी हा 7 टक्के असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी असल्याचेही येचुरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाMartyrशहीदSoldierसैनिक