शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

'मोदींच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये 176% अन् शहीद जवानांच्या संख्येत 93% वाढ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:59 IST

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाकडून मोदी आणि भाजपा सरकारविरुद्ध मोहिम राबविण्यात येत आहे. मोदी सरकारकडून पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकचे राजकारण केले जात असल्याचे सीपीएमने म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारला उघडं पाडण्याचं काम सीपीएम करेल, असा ठरावच सीपीएमच्या झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. त्यानुसार सीपीएमचे सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात वाढलेल्या दहशतवादी घटनांची आकडेवारीच दिली आहे. 

माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस सिताराम येचुरी यांनी म्हटलं की, दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकत्र आला आहे. मात्र, भाजपाकडून या एकतेला तडा देण्याचं काम सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये फायदा घेण्यासाठी भाजपा या मतभेद निर्माण करत आहे. भारतीय विरुद्ध मुस्लीम आणि भारतीय विरुद्ध काश्मिरी, असा वाद पेटविण्याचं काम भाजपाकडून सुरू आहे. केंद्र सरकारच्या एका समितीच्या आकडेवारीनुसार, मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 176% वाढ झाली आहे. तर नागरिक आणि सुरक्षा जवानांच्या मृत्युच्या संख्येतही 93% वाढ झाली आहे. सन 2014 ते 2018 या कालावधीत प्रत्येक महिन्याला 11 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचं या आकडेवारीवरुन समोर आल्याचं येचुरी यांनी सांगितलं आहे. 

तसेच काश्मिरी तरुणांचे दहशतवादी संघटनांकडे वळण्याचे प्रमाणही याच काळात वाढले आहे. सन 2013 मध्ये हे प्रमाण 16 असे होते, पण आता 2018 मध्ये हे प्रमाण 164 पर्यंत पोहोचले आहे. भाजपाकडून जाणीवपूर्वक कट्टर राष्ट्रवादाला खतपाणी घालण्यात येत असून गंभीर मुद्द्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील सन 2018-19 चा जीडीपी हा 7 टक्के असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वात कमी जीडीपी असल्याचेही येचुरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाMartyrशहीदSoldierसैनिक