शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

ुं्नबाजारभाव

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

भाज्यांपाठोपाठ कडधान्येही कडाडली

भाज्यांपाठोपाठ कडधान्येही कडाडली
तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ९० रुपये, चणाडाळ ८० रुपये, उडीद डाळ १३० रुपये प्रती किलो
पणजी : दिवसेंदिवस भाजी बाजारपेठेत वाढलेल्या दरांमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना आता कडधान्नेदेखील वाढलेल्या दरात खरेदी करावी लागत आहेत. कडधान्यांच्या उत्पादनात घट झाल्याने त्यांची आवक मंदावली असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहकांना फटका बसत आहे.
बाजारपेठेत सध्या तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ९० रुपये, चणाडाळ ८० रुपये, उडीद डाळ १३० रुपये प्रती किलो या दराने विकली जात आहे. टोमॅटोचे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेले असून ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. कारली, भेंडी, चिटकी आणि बीट प्रत्येकी ४० रुपये किलो दराने विकली जात आहे. मेथी व कोथिंबीर प्रत्येकी १०, तर पालक ५ रुपयांना एक जुडी विकली जात आहे. ढब्बू मिरची, हिरवी मिरची आणि गाजर देखील प्रत्येकी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
विक्रे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टोमॅटोच्या पुरवठ्यात घट झाल्याकारणाने त्याचा दर वाढलेला आहे. बेळगाव परिसरात भाज्यांसाठी पूरक अशा प्रमाणात पाऊस न झाल्यास भाज्यांच्या पुरवठ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवलेली आहे.
भाजी आणि कडधान्यांप्रमाणे मसाल्याच्या पदार्थांचे दरदेखील वाढलेले आहेत. आठवड्याभरापूर्वी भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर होते. मात्र, हे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढत्या दरामुळे खिशाला बसणार्‍या फटक्याच्या विचार करता ग्राहक हैराण झालेले आहेत. खास करून बजेट कसे सांभाळावे, असा गृहिणींना प्रश्न पडलेला आहे.

पावसाळी भाज्या/ फळे बाजारपेठेत दाखल
भाजी बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात पावसात उगवणार्‍या भाज्या दाखल झालेल्या आहेत. आळू, गावठी काकडी, ताळखिळा अशा भाज्या विक्र ीस ठेवलेल्या दिसतात. आळू वीस रुपये दराने विकले जात आहे, तर काकडी वीस रुपयांना तीन या दराने विकली जात आहे. घोसाळी २५ रुपये एक या दराने विकले जात आहे.