शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

ुं्नबाजारभाव

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

भाज्यांपाठोपाठ कडधान्येही कडाडली

भाज्यांपाठोपाठ कडधान्येही कडाडली
तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ९० रुपये, चणाडाळ ८० रुपये, उडीद डाळ १३० रुपये प्रती किलो
पणजी : दिवसेंदिवस भाजी बाजारपेठेत वाढलेल्या दरांमुळे हैराण झालेल्या ग्राहकांना आता कडधान्नेदेखील वाढलेल्या दरात खरेदी करावी लागत आहेत. कडधान्यांच्या उत्पादनात घट झाल्याने त्यांची आवक मंदावली असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. मात्र, वाढत्या दरामुळे ग्राहकांना फटका बसत आहे.
बाजारपेठेत सध्या तूरडाळ १२० रुपये, मसूरडाळ ९० रुपये, चणाडाळ ८० रुपये, उडीद डाळ १३० रुपये प्रती किलो या दराने विकली जात आहे. टोमॅटोचे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेले असून ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. कारली, भेंडी, चिटकी आणि बीट प्रत्येकी ४० रुपये किलो दराने विकली जात आहे. मेथी व कोथिंबीर प्रत्येकी १०, तर पालक ५ रुपयांना एक जुडी विकली जात आहे. ढब्बू मिरची, हिरवी मिरची आणि गाजर देखील प्रत्येकी ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
विक्रे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टोमॅटोच्या पुरवठ्यात घट झाल्याकारणाने त्याचा दर वाढलेला आहे. बेळगाव परिसरात भाज्यांसाठी पूरक अशा प्रमाणात पाऊस न झाल्यास भाज्यांच्या पुरवठ्यात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीच्या दरातदेखील वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तवलेली आहे.
भाजी आणि कडधान्यांप्रमाणे मसाल्याच्या पदार्थांचे दरदेखील वाढलेले आहेत. आठवड्याभरापूर्वी भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर होते. मात्र, हे दर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढत्या दरामुळे खिशाला बसणार्‍या फटक्याच्या विचार करता ग्राहक हैराण झालेले आहेत. खास करून बजेट कसे सांभाळावे, असा गृहिणींना प्रश्न पडलेला आहे.

पावसाळी भाज्या/ फळे बाजारपेठेत दाखल
भाजी बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात पावसात उगवणार्‍या भाज्या दाखल झालेल्या आहेत. आळू, गावठी काकडी, ताळखिळा अशा भाज्या विक्र ीस ठेवलेल्या दिसतात. आळू वीस रुपये दराने विकले जात आहे, तर काकडी वीस रुपयांना तीन या दराने विकली जात आहे. घोसाळी २५ रुपये एक या दराने विकले जात आहे.