शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उमा भारती लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, 'हे' आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 13:52 IST

भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देभाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे.2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून तिर्थयात्रेला जाण्यासाठी उमा भारती निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे. 

नवी दिल्ली - भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी (22 मार्च) लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. 2016 मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपासून तिर्थयात्रेला जाण्यासाठी उमा भारती निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे.  मात्र आता त्यांनीच लोकसभा 2019 निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण स्पष्ट केले आहे. 

'मी 2016 मध्येच निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे. जर मी निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. मी माझा मतदारसंघ कधीही बदलू शकत नाही. तेथील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानत आहेत' असं उमा भारती यांनी म्हटले आहे. तसेच पुढे दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमा भारती यांनी '2024 मध्ये निवडणूक लढवेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शानदार बहूमत मिळवेन' असं म्हटलं आहे. आगामी निवडणूका न लढवण्याची माहिती भाजपा महासचिव रामलाल यांना दिली होती. रामलाल यांनी उमा भारतींना तीर्थयात्रेसाठी जाण्याआधी पक्षासाठी प्रचार करण्याबाबत सांगितले होते. 'पक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे' असं उमा भारती यांनी सांगितलं आहे.   

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक