शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Ram Mandir Bhumi Pujan : 'राम की मर्यादा से बंधी हूं'; उमा भारती राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 11:26 IST

माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 'राम की मर्यादा से बंधी हूं', असे म्हणत राम मंदिराच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगितले

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे.

अयोध्या : अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज होणार आहे. या सोळ्यात माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी 'राम की मर्यादा से बंधी हूं', असे म्हणत सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. यावेळी उमा भारती म्हणाल्या की, "मी मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मर्यादेला बांधील आहे. मला रामजन्मभूमी ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी निर्देश दिले आहेत, त्यामुळे मी या सोहळ्यात उपस्थित राहणार आहे."

यापूर्वी माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिर भूमिपूजनच्या सोहळण्यातील निमंत्रितांच्या यादीतून आपले नाव हटवण्यास सांगितले होते. यावेळी त्यांनी अयोध्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात येणार, मात्र मंदिर ठिकाणी न थांबता शरयू नदीच्या काठी थांबणार असल्याचे सांगितले होते.

उमा भारती यांनी ट्विट केले होते की, जेव्हापासून अमित शाह तसेच यूपी भाजपाच्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ऐकले, तेव्हापासून मी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या लोकांसाठी विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी चिंतित आहे. त्यामुळे मी रामजन्मभूमी ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे की, भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर उपस्थित असणार आहे." याचबरोबर, पंतप्रधान मोदी आणि इतर लोक गेल्यानंतर आपण रामलल्लाचे दर्शन घेऊ, असेही उमा भारती यांनी म्हटले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत.

देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत ५ ऑगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.     

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या