शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

UIDAIची 127 आधार धारकांना नोटीस, उद्यापर्यंत सिद्ध करावं लागणार नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 09:21 IST

ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत.

ठळक मुद्देहैदराबाद कार्यालयानं मंगळवारी कथित आणि चुकीच्या पद्धतीनं आधार क्रमांक मिळवणाऱ्या 127 जणांना नोटीस पाठवली आहे. ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत.  UIDAIने 3 फेब्रुवारीला दिलेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, हैदराबादेतल्या प्रादेशिक कार्यालयाला एक तक्रार मिळाली.

नवी दिल्लीः भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा(UIDAI)च्या हैदराबाद कार्यालयानं मंगळवारी कथित आणि चुकीच्या पद्धतीनं आधार क्रमांक मिळवणाऱ्या 127 जणांना नोटीस पाठवली आहे. UIDAIच्या मते, त्यांना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. ज्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यातील जास्त करून लोक मुस्लिम समुदायाचे आहेत. UIDAIने 3 फेब्रुवारीला दिलेल्या नोटिशीत लिहिलं आहे की, हैदराबादेतल्या प्रादेशिक कार्यालयाला एक तक्रार मिळाली. त्यामुळे त्या संबंधित व्यक्तींना भारताचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. त्यांनी चुकीची माहिती देऊन खोटी कागदपत्रं दाखवून आधार नंबर मिळवला आहे, असाही त्यात उल्लेख आहे. आता त्या लोकांना आपलं नागरिकत्व प्रमाणित करावं लागणार आहे.   

  • 20 फेब्रुवारीला सादर होण्याचे निर्देश 

हैदराबाद प्रादेशिक कार्यालयाकडून बर्‍याच वर्षांपासून या प्रकरणाची तपासणी केली जात आहे. या संबंधांत सर्व 127 लोकांना 20 फेब्रुवारीला इन्क्वॉयरी ऑफिसर अमिता बिंदरू यांच्या समोर खरे दस्तावेज दाखवून नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. जर त्यांनी नागरिकत्व सिद्ध केलं नाही, तर त्यांचं आधार कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रं द्यावी लागणार आहेत हे नोटिशीमध्ये सांगण्यात आलं आहे. 

  • रिक्षाचालकाचं आधार खोटं असल्याची तक्रार

हैदराबादेतल्या 40 वर्षीय ऑटो-रिक्षाचालकाला UIDAIनं एका तक्रारीनंतर नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितलं आहे. तक्रारीत त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड असल्याचं सांगण्यात येत आहे. बायोमेट्रिक्स-आधारित ओळखपत्र प्रणाली चालवणाऱ्या प्राधिकरणाच्या उपसंचालक आणि तपास अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकाला 20 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता त्यांच्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.     

  • काय आहे आधार अ‍ॅक्ट?

आधार अ‍ॅक्ट 2016नुसार, आधार हा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व सिद्ध करतो. आधार अधिनियमांतर्गत  UIDAIला आधार कार्ड वितरीत करायचं की नाही हे ठरवावं लागणार आहे. एखाद्या व्यक्तीचा अर्ज आल्यानंतर भारतात कमीत कमीत 182 दिवस ती व्यक्ती वास्तव्याला असली पाहिजे. तरच त्याला आधार कार्ड देण्यात येते.  

  • सर्वोच्च न्यायालयानं दिले निर्देश 

सर्वोच्च न्यायालयानं आपल्या ऐतिहासिक निर्णयात यूआयडीएआय (UIDAI)ला अवैध प्रवाशांना आधार कार्ड जारी न करण्याचे निर्देश दिले आहेत.