शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं; अमित शाह यांनी साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 09:38 IST

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे असंही शाह यांनी सांगितले.

नवी दिल्ली - Amit Shah on Uddhav Thackeray ( Marathi News ) मुलगा मुख्यमंत्री व्हावा असं उद्धव ठाकरेंना वाटतं, घराणेशाही वाचवण्यासाठी सगळे विरोधक एकत्र आलेत. भाजपात प्रवेश केलेल्यांच्या कुठल्याही केसेस मागे घेतल्या नाहीत असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

अमित शाह म्हणाले की, विरोधकांची आघाडी ही केवळ सत्तेसाठी एकत्र आलेत. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं यासाठी एकत्रित आलेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलाने मुख्यमंत्री बनावं हे उद्धव ठाकरेंचं लक्ष्य आहे. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे असं त्यांनी म्हटलं. टीव्ही ९ च्या ग्लोबल समिटमध्ये शाह यांची मुलाखत झाली. त्यात ते बोलले. 

तसेच भाजपा कुणी आले म्हणून त्याच्यावरील केसेस बंद झाल्या असं नाही. कुणावरील गुन्हे मागे घेतले नाहीत. ईडीकडून ज्या कारवाया सुरू आहेत त्या तशाच आहेत. लाखो कोटी रुपये जप्त करण्यात आले हा देशातील काळ्या पैशाविरोधात अभियान आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला १३० कोटी जनतेचे प्रतिनिधित्व म्हणून पंतप्रधान मोदी तिथे होते. तुम्ही पंतप्रधानांना भाजपाचं म्हणणार मग कसं चालेल? आम्ही मंदिर बनवलं, या देशातील ६० कोटी जनतेला ७० वर्ष काँग्रेसनं सन्मान दिला नाही. आम्ही १० वर्षात १० कोटी मातांच्या घरी चूल बंद करून गॅस दिला. ३ कोटी महिलांना घरे दिली. अनेक आरोग्य योजना आणल्या असंही शाह यांनी सांगितले. 

कलम ३७० हटल्यानं जम्मू काश्मीरमध्ये शांतता

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेक बंद झाली, दहशतवाद कमी झाला. गुंतवणूक येतेय. राज्याचा विकास सुरू आहे. आज ३५ हजार लोक लोकप्रतिनिधी झालेत. याआधी केवळ ३ घराणे काश्मीरात कलम ३७० च्या नावाखाली लोकशाही दडपून बसले होते. आज तिथे सर्व सुरळीत आहे असं गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी