शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court: एकनाथ शिंदेंनी काय करायला हवे होते? सिब्बलांनी घटनापीठाला सांगितले पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 16:10 IST

लंच ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांनी पुन्हा युक्तीवाद केला आहे. राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शिंदे आणि ठाकरे गटातील सुनावणीचा दुसरा दिवस आज संपला आहे. आता सरन्यायाधीशांसह तीन जजच्या बेंचसमोर ठाकरे गटाच्या निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. असे असताना लंच ब्रेकनंतर सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांनी पुन्हा युक्तीवाद केला आहे. 

यावेळी त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडून आलेले सरकार पाडले जाईल हे माहीत असल्याशिवाय राज्यपाल शपथ का देतात? खूप गंभीर बाब आहे. राज्यपालांकडे भाजपासोबत सत्ता स्थापन करतोय असे सांगायला शिंदे कोणत्या अधिकारात गेले होते, तिथे पक्ष प्रमुख या नात्याने पक्षाच्या नेत्याने जायला हवे होते. तरी देखील राज्यपालांनी शिंदेंना तुम्ही कोणच्या पक्षाकडून आलात असे देखील विचारले नाही, असे सिब्बल म्हणाले. 

शिंदेंना प्रश्न विचारला गेला नाही, कारण ते राज्यपालांना आधीच माहिती होते. शिवसेना शिंदेंसोबत नाही, मग या गटाला सत्ता स्थापन करण्याची संधी कशी दिली गेली. माझ्याकडे ४० सदस्य आहेत आणि आता मला जे आवडते ते मी करू शकतो आणि मी तुम्हाला काढून टाकू शकतो असे म्हणणे- हे अकल्पनीय आहे, असा सवालही सिब्बल यांनी उपस्थित केला. 

यावेळी सरन्यायाधीशांनी सिब्बल यांना मग जर एखादा व्यक्ती पक्षात असंतुष्ट असेल किंवा दु:खी असेल तर काय करायला हवे होते, असा सवाल केला. तेव्हा सिब्बल यांनी तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला असे सांगत, एखादी व्यक्ती दुखी असेल तर काय करावे? याचे उत्तर रामानंद रेड्डी मधील ECI च्या निकालात आहे. असे सांगितले. 

शिंदेंनी जे केले ते सर्व 218 चे उल्लंघन आहे. प्रत्येक कृती म्हणजे स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडणे होय. दहाव्या शेड्यूल अंतर्गत त्यात कोणतेही संरक्षण मिळत नाही. तुम्ही शिवसेनेचे सदस्य असल्याचे जाहीर करता, तेव्हा तुम्ही स्वाभाविकपणे शिवसेनेच्या घटनेनुसार असले पाहिजे. शिवसेनेचे संविधान तुम्हाला तुमचा आवाज उठविण्याची आणि पाठिंबा मिळवण्याची मुभा देते, असे सिब्बल य़ांनी सांगितले. 

तेव्हा घटनापीठाचे दुसरे न्यायमूर्ती नरसिंह यांनी सिब्बल यांना मग काय करायला हवे होते, असे विचारले. तेव्हा सिब्बलांनी तुम्हाला संविधानानुसार पक्षात जावे लागेल. सर्व प्रयत्न करा. आवाज उठवा. तुमची मते मांडा. आपल्यासोबत एक भरीव संख्या मिळवा, फूट पडल्याचा दावा करा, नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करायला हवा होता असे सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना