शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे यांनीही गुवाहाटीत यावं अन्...", आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डिवचलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 17:39 IST

Assam CM : उद्धव ठाकरे यांनाही गुवाहाटीत यावे, असे सांगत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी डिवचले आहे. 

नवी दिल्ली : आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यातच आता उद्धव ठाकरे यांनाही गुवाहाटीत यावे, असे सांगत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी डिवचले आहे. 

एकनाथ शिंदे गटाच्या सर्व महत्वाच्या बैठका आणि महत्वाचे निर्णय गुवाहाटीमधून घेतले जात आहेत. त्यामुळे आसाममध्ये एकीकडे पुरस्थिती असताना सर्वांचे लक्ष गुवाहाटीतील एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांकडे आहे. याविरोधात गुरूवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलसमोर आंदोलन केले. तसेच, महाराष्ट्रातील आमदारानी परत जावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, याला आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

आसामध्ये येण्यापासून मी कुणालाही रोखू शकत नाही. तुम्ही हॉटेलमध्ये बुकिंग केले तर मी तुम्हाला येऊ नका, असे कसे सांगू शकतो. देशात सर्वत्र फिरण्याचा, राहण्याचा नागरिकांना अधिकार आहे, असे हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले. तसेच, मी देशातील सर्व आमदारांना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देतो. महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होईल, माहीत नाही. पण ते (आमदार) जितके दिवस राहतील, तितके दिवस माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांनाही सुट्टीसाठी यावे, असेही हिमंत बिस्वा सरमा म्हणाले.

आमदारांची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे -भूपेन कुमार बोराह या सर्व घडोमोडीत आता आसाम कॉंग्रेसचे प्रमख भूपेन कुमार बोराह यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहीत लवकरात लवकर आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. राज्याच्या हितासाठी आसाम कॉंग्रेसने एकनाथ शिंदेंना आसाम सोडण्याचे आवाहन केले आहे. आसाममधील लोक नैतिकतेला महत्त्व देतात. महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांसह गुवाहाटीमध्ये तुमची उपस्थिती राज्याला चुकीचा संदेश देत आहे, असे बोरा यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAssamआसामMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण