शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे भाजपसोबतची युती फिस्कटली; राहुल शेवाळे यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 05:56 IST

शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भाजपसोबत जाण्यासाठी अनेकदा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. ते सुद्धा भाजपसोबत जाण्यास राजी होते. परंतु त्यांच्या करणी व कथनीत फरक होता. गेल्यावर्षी भाजपच्या १२ आमदारांना निलंबनाच्या घटनेमुळे भाजप श्रेष्ठी नाराज होते. एकीकडे युतीच्या गोष्टी करायच्या व दुसरीकडे आमदारांवर कारवाई, हे दुटप्पी धोरण उद्धव ठाकरे यांचे होते, असा गंभीर आरोप खासदार राहुल शेवाळे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची भेट घेऊन गटनेता बदलण्याची मागणी केली. १८ खासदारांपैकी १२ जणांचा गटनेता म्हणून शेवाळे यांना पाठिंबा असल्याने गटनेतेपदी शेवाळे यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून भावना गवळी यांची नियुक्ती करण्याचे सुचविले आहे. यावर लोकसभा  अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्व खासदारांची बैठक घेऊन निर्णय घ्यावा, असे निर्देश अध्यक्षांनी भावना गवळी यांना दिले. 

शिवसेनेचे सध्याचे गटनेते विनायक राऊत यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे बहुसंख्य खासदारांनी एकत्र येऊन नेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. वेगळा गट किंवा पक्ष स्थापन केलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले... कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच 

तुम्ही आमच्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण ते बाण चालविण्यासाठी धनुष्य तर लागेल ना? ते धनुष्य माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. शिवसेना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत. ही फूट बंडखोरांनी पाडली नाही तर ती भाजपने पाडली आहे, असा आरोपही त्यांनी केला.

उत्तर भारतीय एकता मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे म्हणाले, भाजप दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावत आहे. एक मेला की दुसऱ्याला तुरुंगात टाकायचे, हा भाजपचा अनेक दिवसांपासूनचा डाव आहे. अशा पद्धतीने भाजपला शिवसेना संपवायची आहे. पण तुम्ही सतर्क राहा. आम्ही ठाकरे आहोत. कितीही संकटे आली तरी संघर्ष करायचा हा आमचा पिंड आहे. संघर्षाला ठाकरे घाबरत नाहीत. हेही दिवस जातील, तोपर्यंत मैदानात उतरू पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करू, असा निर्धार ठाकरे यांनी व्यक्त केला.

आम्ही पक्ष फोडला नाही

जनतेच्या विकासासाठी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्ष तोडलेला नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. शिवसेनेचा नेता म्हणून मी राज्याचा मुख्यमंत्री झालेलो आहे. शिवसेना पक्षप्रमुख आपण नाही. आम्ही शिवसेनेचा वेगळा गट स्थापन केलेला नाही. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

अद्यापही आम्ही एनडीएतच

शिवसेना एनडीएचा घटकपक्ष आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी एनडीएतून बाहेर पडत असल्याचे पत्र दिले नव्हते तसेच यूपीएमध्ये शिवसेना सामील होणार असल्याचे पत्र दिलेले नव्हते. त्यामुळे शिवसेना अद्यापही एनडीएचा घटक पक्ष आहे. हेच धोरण आम्ही पुढे नेत आहोत. - राहुल शेवाळे, खासदार

भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे

भाजपला केवळ शिवसेना तोडायची नाही तर त्यांनी महाराष्ट्राचे तीन तुकडे करावयाचे आहे, असे भाजपचे नेते उघडपणे बोलत आहेत. भाजपचा हा डाव लपून राहिलेला नाही. यासाठी पहिल्यांदा शिवसेना संपविणे आवश्यक आहे. यासाठी भाजपचा हा डाव सुरू आहे. पण शिवसेनेच्या चिन्हावर, ताकदीवर निवडून आलेले आमदार, खासदार आज जरी पाठीत खंजीर खुपसून जात असतील तरी शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. शिवसेना या सगळ्यातून पुन्हा उभी राहील आणि आज ज्यांच्या घराबाहेर पहारे आहेत त्यांना परत कोणत्याही सभागृहात येणं आम्ही कठीण करू. - संजय राऊत, खासदार

जनतेत संभ्रम पसरविण्याचा प्रकार 

महाराष्ट्रात पुन्हा शिवसेना-भाजप सरकार स्थापन करण्याबाबत गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली होती, हा दावा हास्यास्पद आहे. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. घेतलेल्या भूमिकेला काहीतरी मुलामा ते देत आहेत. भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना हिणवले, आदित्य ठाकरे यांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, याची उत्तरे आधी शिंदे समर्थकांनी द्यावीत.    - खा. अरविंद सावंत, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते   

सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 

- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, दि. २० रोजी सुनावणी होणार आहे. तत्कालीन उपाध्यक्षांनी १६ आमदारांना अपात्र ठरविण्यासंदर्भात पाठविलेल्या नोटिसीविरुद्ध शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात दाद मागितलेली आहे.

- याशिवाय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून दाखल याचिकांवरही आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होईल. 

- या सर्व याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या त्रिसदस्यीय खंडपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRahul Shewaleराहुल शेवाळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे