शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

भारतासाठी खजिना उघडणार; निवडणुकीपूर्वी दुबईचा मित्र PM मोदींना मोठी भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 17:27 IST

भारतात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आखाती देशांसोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली.

दुबई  - आखाती देशात सुमारे ३५ लाख भारतीय असलेल्या संयुक्त अरब अमिरातीचे सरकार भारतात ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. भारत हा UAE मुस्लिम देशाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देखील आहे. UAE ला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर नशीब आजमवायचं आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी UAE भारतात ५० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकते असं बोलले जात आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी UAE अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद यांच्या निमंत्रणावरून आतापर्यंत ५ वेळा अबुधाबीला भेट दिली आहे.

भारतात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आखाती देशांसोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. UAE सौदी अरेबियासह आखाती देशांच्या मुस्लिम देशांच्या प्रमुखांचा पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणात समावेश करण्यात आला होता. १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांच्या भेटीनंतर UAE ला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते यावरून पंतप्रधान मोदींच्या या पावलाचे महत्त्व लक्षात येते. आज, भारत आणि UAE मधील मैत्री सर्वोत्तम टप्प्यात आहे आणि दोन्ही देशांना तेलविरहित द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवायचा आहे.

UAE भारताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये आणि सरकारी संपत्तीत ५० अब्जची गुंतवणूक करू इच्छित आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी UAE भारतात या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करेल, असे मानले जात आहे. मात्र, एकूण गुंतवणूक आणि त्याची वेळ याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विश्लेषकांच्या मते, UAE भारतातील वेगाने वाढणाऱ्या मध्यमवर्गाकडे लक्ष देत आहे. UAE व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि कतारमधूनही भारतात मोठी गुंतवणूक केली जाऊ शकते.

 एकीकडे अमेरिका विरुद्ध चीन असा जगात तणाव वाढत असताना UAE ने भारताच्या दिशेने पाऊल टाकले आहे आणि कोणत्याही एका देशाची बाजू घेण्यास नकार दिला आहे. आज UAE हा भारताचा प्रमुख भागीदार देश बनला आहे. भारत UAE आणि इस्रायल यांच्यात व्यापार आणखी वाढावा यासाठी करार करण्यात आले. UAE हा केवळ व्यापार आणि गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत नाही तर भारतासाठी परकीय चलनाचा एक प्रमुख स्रोत आहे. २०२१ मध्ये ३५ लाख भारतीय UAE मध्ये राहत होते. हे UAE च्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के आहे. हे भारतीय दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन भारतात पाठवतात. यामुळे भारताचा परकीय चलन साठा मजबूत आहे. केरळमधील सर्वाधिक लोक यूएईमध्ये राहतात. भारतातील लोक यूएईमध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

टॅग्स :IndiaभारतUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती