शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

भारतासाठी खजिना उघडणार; निवडणुकीपूर्वी दुबईचा मित्र PM मोदींना मोठी भेट देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 17:27 IST

भारतात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आखाती देशांसोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली.

दुबई  - आखाती देशात सुमारे ३५ लाख भारतीय असलेल्या संयुक्त अरब अमिरातीचे सरकार भारतात ५० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. भारत हा UAE मुस्लिम देशाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देखील आहे. UAE ला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर नशीब आजमवायचं आहे. पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी UAE भारतात ५० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकते असं बोलले जात आहे. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी UAE अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद यांच्या निमंत्रणावरून आतापर्यंत ५ वेळा अबुधाबीला भेट दिली आहे.

भारतात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आखाती देशांसोबत मैत्री वाढवण्यास सुरुवात केली. UAE सौदी अरेबियासह आखाती देशांच्या मुस्लिम देशांच्या प्रमुखांचा पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणात समावेश करण्यात आला होता. १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांच्या भेटीनंतर UAE ला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान होते यावरून पंतप्रधान मोदींच्या या पावलाचे महत्त्व लक्षात येते. आज, भारत आणि UAE मधील मैत्री सर्वोत्तम टप्प्यात आहे आणि दोन्ही देशांना तेलविरहित द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवायचा आहे.

UAE भारताच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये आणि सरकारी संपत्तीत ५० अब्जची गुंतवणूक करू इच्छित आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी UAE भारतात या मोठ्या गुंतवणुकीची घोषणा करेल, असे मानले जात आहे. मात्र, एकूण गुंतवणूक आणि त्याची वेळ याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विश्लेषकांच्या मते, UAE भारतातील वेगाने वाढणाऱ्या मध्यमवर्गाकडे लक्ष देत आहे. UAE व्यतिरिक्त सौदी अरेबिया आणि कतारमधूनही भारतात मोठी गुंतवणूक केली जाऊ शकते.

 एकीकडे अमेरिका विरुद्ध चीन असा जगात तणाव वाढत असताना UAE ने भारताच्या दिशेने पाऊल टाकले आहे आणि कोणत्याही एका देशाची बाजू घेण्यास नकार दिला आहे. आज UAE हा भारताचा प्रमुख भागीदार देश बनला आहे. भारत UAE आणि इस्रायल यांच्यात व्यापार आणखी वाढावा यासाठी करार करण्यात आले. UAE हा केवळ व्यापार आणि गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत नाही तर भारतासाठी परकीय चलनाचा एक प्रमुख स्रोत आहे. २०२१ मध्ये ३५ लाख भारतीय UAE मध्ये राहत होते. हे UAE च्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ३० टक्के आहे. हे भारतीय दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन भारतात पाठवतात. यामुळे भारताचा परकीय चलन साठा मजबूत आहे. केरळमधील सर्वाधिक लोक यूएईमध्ये राहतात. भारतातील लोक यूएईमध्ये प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.

टॅग्स :IndiaभारतUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिराती