शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

उद्योग क्षेत्रात वाढले फसवणुकीचे प्रकार! ८९ टक्के कंपन्यांचा अनुभव : सायबर सुरक्षा ही चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 04:22 IST

भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.

नवी दिल्ली : भारतात उद्योग क्षेत्राशी संबंधित फसवणुकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या १२ महिन्यांच्या काळात आम्हाला किमान एका फसवणुकीच्या घटनेचा बळी व्हावे लागले, असे देशातील ८९ टक्के कंपन्यांच्या कार्यकारी अधिका-यांनी सांगितले आहे. सन २0१६मध्ये घोटाळ्याची कबुली देणा-या कार्यकारी अधिका-यांचे प्रमाण ६८ टक्के होते.‘क्रॉल अ‍ॅन्युअल ग्लोबल फ्रॉड अ‍ॅण्ड रिस्क’ या अहवालात ही माहिती देण्यात आली. यानुसार, भारतातील फसवणुकीच्या घटनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यात आयपी चो-या, पायरसी व बनवेगिरी ३६ टक्के आणि भ्रष्टाचार व लाच याचे प्रमाण ३१ टक्के आहे. गेल्या १२ महिन्यांतील घटनांच्या विश्लेषणानुसार, ४५ टक्के उत्तरदात्यांनी त्यांच्या फसवणुकीला भागीदार जबाबदार असल्याचे सांगितले.गेल्या वर्षी विद्यमान व माजी कर्मचारीच फसवणुकीतील प्रामुख्याने आरोपी होते. यंदा कनिष्ठ कर्मचारी अशा घटनांतील आरोपींमध्ये दुसºया स्थानी आहेत. ४३ टक्के प्रकरणात कनिष्ठ कर्मचारी आरोपी असल्याचे समोर आले आहे. फसवणूक व घोटाळ्यांचा फटका बसलेल्यांची संख्या २0१७ मध्ये २१ टक्क्यांनी वाढून ८९ टक्क्यांवर गेली आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण ८४ टक्के आहे. याचाच अर्थ भारतात फसवणुकीचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक म्हणजे सर्वाधिक आहे, असे क्रॉलच्या दक्षिण आशियाच्या व्यवस्थापकीय संचालक रेशमी खुराणा यांनी सांगितले.फसवणुकीमुळे आपल्या कंपनीला एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसला, असे अनेक अधिकाºयांनी सांगितले. फसवणुकीमुळे एकूण महसुलाच्या सात टक्क्यांपेक्षा जास्त फटका बसलेल्या देशांत मेक्सिको अव्वलस्थानी आहे. तेथील ३९ टक्के अधिका-यांनी अशी तक्रार केली.सायबर हल्ल्यामुळे बेजार-सायबर सुरक्षा हा चिंतेचा मुद्दा आहे. गेल्या १२ महिन्यांत सायबर हल्ला झाल्याचे त्यांनी मान्य केले. २0१६मध्ये हे प्रमाण ७३ टक्के होते, ते २0१७ साली ६४ टक्के झाले आहे. याचाच अर्थ यंदा त्यात ११ टक्के वाढ झाली आहे. फसवणूक, सायबर व सुरक्षा जोखीम यात वाढ झाल्याचे उत्तरदात्यांनी मान्य केले.