शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते म्हणतात, मोदींना सातत्याने खलनायक ठरवणे चुकीचे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 12:31 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असते.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेल्या प्रत्येक कृतीवर विरोधकांकडून जोरदार टीका होत असते. दरम्यान, काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते जयराम रमेश आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी नरेंद्र मोदींना सतत खलनायक ठरवणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदींचा सातत्याने खलनायक असा उल्लेख करून विरोधक त्यांचीच मदत करत आहेत, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. तर जयराम रमेश यांनी काल असेच वक्तव्या करताना  नरेंद्र मोदींना प्रत्येक वेळी व्हिलन ठरवून त्यांच्यावर टीका करत राहिल्याने काहीही हाती लागणार नाही, असा सल्ला रमेश यांनी दिला होता. जयराम रमेश यांनी केलेल्या वक्तव्याचा आधार घेत अभिषेक मनु सिंघवी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात, मोदींना खलनायकाप्रमाणे सादर करणे हे चुकीचे आहे. ते पंतप्रधान आहेत म्हणून नव्हे तर असे करून विरोध त्यांचीच मदत करत आहेत. काम हे चांगले, वाईट किंवा सामान्य असू शकते. त्यामुळे कामाचे मूल्यांकन हे व्यक्ती नव्हे तर मुद्द्यांच्या आधारावर झाले पाहिजे. उज्ज्वला योजना ही चांगल्या कामांपैकी एक आहे.'' 

दरम्यान, काँग्रेसचे एक ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते जयराम रमेश यांनीही नरेंद्र मोदींना सातत्याने व्हीलन ठरवण्याच्या विरोधकांच्या सवयीवर टीका केली होती. ''पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचे मॉडेल हे पूर्णपणे नकारात्मक नाही. त्यांनी केलेल्या कार्याचे महत्त्व नाकारणे आणि प्रत्येकवेळी त्यांनी खलनायक म्हणून सादर केल्याने काहीही हाती लागणार नाही. मोदींचे कार्य आणि 2014 ते 2019 या काळात त्यांनी जे काही केले त्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, ज्यामुळे ते पुन्हा सरकारमध्ये परतले आहेत.'' असे रमेश म्हणाले होते. 
राजकीय विश्लेषक कपिल सतीश कोमीरेड्डी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन जयराम रमेश यांनी केलेले. त्यावेळी ते म्हणाले की, ''मोदी जे बोलतात ती भाषा त्यांना लोकाशी जोडते. ते अशी कामे करत आहेत ज्याची जनतेकडून प्रशंसा होत आहे, अशी कामे याआधी झालेली नाहीत. जोपर्यंत हे आम्ही मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचा सामना करू शकणार नाही.''   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण