शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

केंद्रातील भाजप सरकारशी विरोधक करणार दोन हात; सर्वपक्षीय बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:01 AM

विद्वेषाचे राजकारण आणि धार्मिक भेदभाव सहन करणार नाही

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सर्वच नेत्यांनी सोमवारी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ले चढविले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात विद्वेषाचे आणि धार्मिक भेदभावाचे राजकारण करीत आहे. त्यासाठी सीएए, एनआरसी व एनपीआरचा वापर करीत असल्याचा आरोप या विरोधी नेत्यांनी केला.

जेएनयूसह सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे, विद्यापीठांमध्ये दडपशाही सुरू आहे. आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांना मारहाण करून डांबून ठेवण्यात येत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी बैठकीत केला. देशाची अर्थव्यवस्था रसातळाला जात असताना, त्याबाबत उपाय योजण्याऐवजी सरकार देशातील जनतेत जाती-धर्माच्या आधारे फूट पाडत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या बैठकीला तृणमूल, बसप, शिवसेना, आम आदमी पार्टी यांचे प्रतिनिधी गैरहजर राहिले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप व काँग्रेस एकमेकांविरोधात लढत असल्याने आपचे नेते येणार नाहीत, ही अपेक्षा होतीच. बसपचे राजस्थानातील सहा आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने संतापलेल्या मायावती यांनीही बैठकीला जाणार नसल्याचे घोषित केले होते. द्रमुकचे नेतेही हजर नव्हते, पण अन्य आधीच ठरलेल्या कार्यक्रमांमुळे येणे शक्य नसल्याचे एम. के. स्टॅलिन यांनी कळविले.

या बैठकीला माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सीताराम येचुरी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राजदचे मनोज झा, भाकपचे डी. राजा, एलजेडीचे शरद यादव यांच्यासह मुस्लीम लीग, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जनता दल (धर्मनिरपेक्ष) आदी पक्षांचे नेते हजर होते.आवाज बंद करण्याचे प्रयत्नबैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले की, केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अयशस्वी ठरले असून, त्यामुळेच देशात भीती व दडपशाहीचे वातावरण निर्माण करीत आहे. तरुणांना रोजगार मिळवून देण्यापेक्षा त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस