शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

पंतप्रधान मोदी व नितीश कुमारांचं त्या 2 फोन कॉल्समुळे पुनर्मिलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 09:27 IST

भाजपा व जेडीयू यांचे पुनर्मिलन होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात झालेल्या दोन फोन कॉल्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

पाटणा, दि. 28 - भाजपा व जेडीयू यांचे पुनर्मिलन होण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यात झालेल्या दोन फोन कॉल्सनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी लालू प्रसाद यादव अडचणीत सापडणार याचा अंदाज व भाजपासोबत युती करण्यासंदर्भातील सकारात्मक गोष्टींमुळे नितीश कुमार यांना हा निर्णय घेण्यास प्रेरित केले. राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणा-या निधीवरुन राज्यांना विशेष दर्जा देण्याची मागणी सध्या केली जात आहे, तेथे बिहारकडे आता केंद्र पूर्णतः लक्ष देईल, असे म्हटले जात आहे.  

''बिहार निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी घोषणा केलेले 1 लाख पंचवीस हजार कोटींचे ‘पॅकेज’ आता बिहारला मिळेल, याविषयी अजिबात शंका नाही'', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनीही सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे.  दरम्यान, जेडीयूला केंद्रीय मंत्रिमंडळात किती जागा मिळणार आहेत, याबाबतचा निर्णय अद्यापपर्यंत घेण्यात आलेला नाही. बिहारमधील शासन सध्या रुळावर आणण्यावर सर्व लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे. 

'इकोनॉमिक्स टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व घडामोडींदरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारमधील अधिका-यांनी भाजपा-जेडीयू नेत्यांसोबत संवाद साधला. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांच्यात बोलणी झाली. नितीश कुमार यांनी बुधवारी रात्री 8.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी दर्शवलेल्या समर्थनाबाबत आभार व्यक्त केले. याआधी 1 तासापूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन सांगितले होते की, देशातील जनता नितीश यांच्या बाजूने आहेत. दोन्ही पार्टीतील नेत्यांनी सांगितले की, फोनवर संक्षिप्त मात्र सौहार्दपूर्ण संवाद झाला.  'इकोनॉमिक्स टाइम्स'च्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 नोव्हेंबर 2016 रोजी नितीश कुमार यांना फोन करुन नोटाबंदी निर्णयाला पाठिंबा दर्शवल्याबाबत त्यांचे फोनवरुन आभार मानले होते, ही माहिती सूत्रांनी दिली आहे.  

केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, दोन्ही नेत्यांमध्ये विकासासंदर्भातील विचार एकसारखे आहेत.  आणखी एका नेत्याचे असे म्हणणे आहे की, 20 वर्षांमध्ये पहिल्यांदा केंद्र व पाटणामध्ये युतीतील सरकार असणार आहे, ज्याचे थेट नाते विकासासोबत असेल.  ''पंतप्रधान मोदी व नितीश कुमार दोघंही विकासावर विश्वास ठेवतात. आगामी काळात जर केंद्राच्या योजनासंबंधीच्या यशोगाथा बिहारमधून आल्यास यात आश्चर्य असे काही वाटू नये. पंतप्रधानांना हेच हवे आहे'', असे केंद्रातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे.  तर नितीश यांनी 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी केली होती.  अधिका-यांनी सांगितले की या विनंतीवर गांभीर्यानं दखल घेऊन निर्णय घेतला जाईल. सोबत केंद्र सरकारलाही अशी अपेक्षा आहे की पंतप्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधानमंत्री पीकविमा योजना यांसारख्या योजनांमध्ये बिहार पुढे येईल.