शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची गोष्ट! आंध्र प्रदेशचा नवरदेव अन् तुर्कीची नवरी, 5000 किमीचा प्रवास करून बांधली लग्नगाठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:20 IST

भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या एक परदेशी तरुणीने थेट आंध्र प्रदेशमध्ये येऊन त्याच्याशी पारंपरिक पद्धतीनं विवाह केला आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले होते. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या एक परदेशी तरुणीने थेट आंध्र प्रदेशमध्ये येऊन त्याच्याशी पारंपरिक पद्धतीनं विवाह केला आहे. यासाठी तिने हजारो किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. दोघांचा आधीच साखरपुडा झाला होता. मात्र एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या जोडप्याला घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा आंध्रप्रदेशमधील गुंटूरचा असणारा मधू संकिरथ हा काही कामानिमित्त तुर्कीमध्ये राहत होता. 2016 मध्ये तुर्कीतील गिजेम नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. दोघंही एकाच संस्थेत आणि एकाच विभागात काम करत होते. मधूचा मदत करण्याचा आणि खेळकर स्वभावामुळे त्याची गिजेमशी मैत्री झाली आणि काही दिवसांतच या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही या प्रेमाचं रुपांतर लग्नात करावं, असा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपले विचार घरच्यांना सांगितले.

2019 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा

लग्नाच्या निर्णयाबाबत समजताच दोन्ही कुटुंबीयांनी याला कडाडून विरोध केला. त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. मधू आणि गिजेम यांनी घरच्यांची समजूत काढली. त्यांना आपण एकमेकांसाठी योग्य जोडीदार असल्याचं पटवून दिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी देखील परवानगी दिली. 2019 मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला आणि 2020 मध्ये त्यांना लग्न करायचं होतं. मात्र नेमका त्याच काळात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघंही आपापल्या देशांत अडकून पडले. 

दाक्षिणात्य पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पडला पार

जुलैमध्ये विमानसेवा सुरू झाल्यानंतर मधू तुर्कीला गेला आणि तिथं दोघांनी तिथल्या पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर दोघंही भारतात आले आणि दाक्षिणात्य पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. पारंपरिक तेलुगु पद्धतीने झालेल्या या लग्न सोहळ्यासाठी जवळचे निमंत्रित उपस्थित होते. सर्वांनी परदेशी वधू आणि देशी वराला भरभरून आशीर्वाद दिले. Map Data नुसार, तुर्की ते गुंटूर हे अंतर 5 हजार किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे लग्नासाठी वधूने केलेल्या या प्रवासाची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नIndiaभारत