शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 20:11 IST

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर

मीरारोड - २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन! क्षयरोगामुळे होणारे मृत्यु आणि रुग्णांच्या संख्येत जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार भारताचा पहिला क्रमांक लागत आहे. तर याच आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याची महिती वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवरांनी दिली आहे. गरीबी, कुपोषण व अस्वछता क्षयरोग वाढण्यास कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आणि विश्व टीबी रिपोर्टच्या आधारानुसार जगातील ६४ टक्के क्षयरोगाचे रु ग्ण हे भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिपिन्स, नायजेरिया, पाकिस्तान व साऊथ आफ्रीका या सात देशांमध्ये आढळतात. या सात देशां पैकी भारताचा क्र मांक सर्वात वरचा लागतो.२०१६ साली जगभरात ४ लाख २३ हजार नागरिकांचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता. २०१८ च्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २ लाख ५४ हजार ७१७ क्षयग्रस्त होते या राज्यात कानपूर जिल्ह्यात १२ हजार ८६३ क्षयरोगांची संख्या होती.उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ११३ तर गुजरातमध्ये १ लाख २३ हजार १०१ क्षयरोगग्रस्त आहेत. या शिवाय छोटी खेडी व दुर्गम भागातील क्षयरोगग्रस्तांची संख्या यामध्ये मोजलेली नाही. जगात दर मिनिटाला क्षय रोगामुळे एक व्यक्ती दगावते आणि यामध्ये जागतिक स्तरावर भारत आघाडीवर आहे.फुफुसरोग तज्ञ डॉ पार्थीव शहा सांगतात की, क्षयरोगाचे जंतू हे अतिसूक्ष्म असून ते क्षयरु ग्णाच्या शिंकण्या, खोकण्या वा थुंकण्यातून हे हवेत मिसळतात व श्वासावाटे इतर व्यक्तींच्या शरीरात शिरतात. आपल्याकडे उघड्यावर थुंकणे सर्वमान्य असल्यामुळे जंतूंचा फैलाव सुलभपणे होतो. क्षयजंतूंचा संसर्ग झाल्यावर क्षयरोगाची लागण त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती व पोषण यावर अवलंबून असते. रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्यास क्षयरोग होऊ शकतो.क्षयरोग झाला की तो लपवण्याची वृत्ती आजही शिक्षित व अशिक्षित नागरिकांमध्ये आढळून येते. सार्वजनिक अस्वच्छता, इतस्तत: थुंकणे, दाटीवाटीच्या वस्तीमुळे घरामध्ये सूर्यप्रकाश न येणे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था अशा अनेक बाबी क्षयरोगाच्या समस्येस कारणीभूत आहे.

क्षयरोग वाढणे म्हणजेच त्या देशामध्ये वाढलेली गरिबी, कुपोषण, आर्थिक विषमता, गचाळ औद्योगिकीकरण व शहरीकरण हे मुद्दे अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.मुंबई, ठाणे आदी मोठया महानगरात देशभरातून आलेले लोक आपल्या सवयी नुसार जगू पाहतात. बकालपणात भर टाकतात. शहरातील श्रीमंत असो की, गरीब कचरा टाकणे, थुंकणे, पान-तंबाखू खाऊन थुंकणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे या सगळया गोष्टी राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी होत असतात.मोठ्या शहरांची ही स्थिती आहे तर मग निमशहरी आणि ग्रामीण भागाची स्थिती किती बिकट असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एक रोगी अनेक जणांना क्षयरोगबाधित करू शकतो, अशी माहिती डॉ अमित थडानी यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य