शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 20:11 IST

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर

मीरारोड - २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन! क्षयरोगामुळे होणारे मृत्यु आणि रुग्णांच्या संख्येत जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार भारताचा पहिला क्रमांक लागत आहे. तर याच आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याची महिती वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवरांनी दिली आहे. गरीबी, कुपोषण व अस्वछता क्षयरोग वाढण्यास कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आणि विश्व टीबी रिपोर्टच्या आधारानुसार जगातील ६४ टक्के क्षयरोगाचे रु ग्ण हे भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिपिन्स, नायजेरिया, पाकिस्तान व साऊथ आफ्रीका या सात देशांमध्ये आढळतात. या सात देशां पैकी भारताचा क्र मांक सर्वात वरचा लागतो.२०१६ साली जगभरात ४ लाख २३ हजार नागरिकांचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता. २०१८ च्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २ लाख ५४ हजार ७१७ क्षयग्रस्त होते या राज्यात कानपूर जिल्ह्यात १२ हजार ८६३ क्षयरोगांची संख्या होती.उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ११३ तर गुजरातमध्ये १ लाख २३ हजार १०१ क्षयरोगग्रस्त आहेत. या शिवाय छोटी खेडी व दुर्गम भागातील क्षयरोगग्रस्तांची संख्या यामध्ये मोजलेली नाही. जगात दर मिनिटाला क्षय रोगामुळे एक व्यक्ती दगावते आणि यामध्ये जागतिक स्तरावर भारत आघाडीवर आहे.फुफुसरोग तज्ञ डॉ पार्थीव शहा सांगतात की, क्षयरोगाचे जंतू हे अतिसूक्ष्म असून ते क्षयरु ग्णाच्या शिंकण्या, खोकण्या वा थुंकण्यातून हे हवेत मिसळतात व श्वासावाटे इतर व्यक्तींच्या शरीरात शिरतात. आपल्याकडे उघड्यावर थुंकणे सर्वमान्य असल्यामुळे जंतूंचा फैलाव सुलभपणे होतो. क्षयजंतूंचा संसर्ग झाल्यावर क्षयरोगाची लागण त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती व पोषण यावर अवलंबून असते. रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्यास क्षयरोग होऊ शकतो.क्षयरोग झाला की तो लपवण्याची वृत्ती आजही शिक्षित व अशिक्षित नागरिकांमध्ये आढळून येते. सार्वजनिक अस्वच्छता, इतस्तत: थुंकणे, दाटीवाटीच्या वस्तीमुळे घरामध्ये सूर्यप्रकाश न येणे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था अशा अनेक बाबी क्षयरोगाच्या समस्येस कारणीभूत आहे.

क्षयरोग वाढणे म्हणजेच त्या देशामध्ये वाढलेली गरिबी, कुपोषण, आर्थिक विषमता, गचाळ औद्योगिकीकरण व शहरीकरण हे मुद्दे अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.मुंबई, ठाणे आदी मोठया महानगरात देशभरातून आलेले लोक आपल्या सवयी नुसार जगू पाहतात. बकालपणात भर टाकतात. शहरातील श्रीमंत असो की, गरीब कचरा टाकणे, थुंकणे, पान-तंबाखू खाऊन थुंकणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे या सगळया गोष्टी राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी होत असतात.मोठ्या शहरांची ही स्थिती आहे तर मग निमशहरी आणि ग्रामीण भागाची स्थिती किती बिकट असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एक रोगी अनेक जणांना क्षयरोगबाधित करू शकतो, अशी माहिती डॉ अमित थडानी यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य