शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

देशावर संघाचा विचार लादण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 28, 2015 23:54 IST

मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीमोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली. मोदी सरकारने देश संघाच्या हवाली केला आहे. देशावर संघाची विचारधारा लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशात केवळ एकच व्यक्ती सर्वज्ञानी आहे. ही व्यक्ती स्वत:ला सर्व विषयातील जाणकार सांगून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.एनएसयूआयच्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात राहुल यांनी मोदी सरकारवर मोजून-मापून हल्ले केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काम करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले. पंतप्रधानांवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, पंतप्रधान चीन, जपान, अमेरिका, मंगोलिया फिरून आले. पण शेतकरी आणि मजुरांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही. एकीकडे मोदी शिक्षण व्यवस्था बळकट करण्याची भाषा करतात. दुसरीकडे देशाचे भविष्य असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये संघाची विचारधारा थोपण्याचे काम सुरू आहे. मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आहे. पण याचे परिणाम ‘शून्य’ येईल, हे मी आजच खात्रीपूर्वक सांगेल. कारण जनतेची भागीदारी गरजेची असताना मोदी सरकार केवळ निवडक उद्योगपतींना सोबत घेऊन हे काम करीतआहे. मोदी सरकारचे गत वर्षभरातील कामकाज याचा पुरावा आहे.४नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बुधवारच्या भेटीचा हवाला देत, राहुल गांधी यांनी मोदी यांना जोरदार टोला लगावला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त करताच, पंतप्रधान मोदी यांनी मनमोहनसिंगांना बोलावून घेत त्यांच्याकडून देशाची अर्थव्यवस्था कशी चालते याचे धडे घेतले, असे ते म्हणाले. ४संघाच्या शाखेत कुणालाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रांगेत उभे राहून सांगितले ते निमूटपणे करणे, एवढेच शाखेत करावे लागते. शिस्तीच्या नावावर व्यक्तीस्वातंत्र्य संपविण्यावर संघाचा विश्वास आहे. हीच विचारधारा देशावर लादण्याचे प्रयत्न भाजप व मोदी सरकार करीत आहे. काँग्रेसची विचारसरणी मात्र वेगळी आहे. येथे सगळ्यांचा आवाज ऐकला जातो. कारण हे काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये आहे. वेगवेगळी मते, विचारधारेचा काँग्रेस मेळ घालते. हीच काँग्रेसची शक्ती आहे. आम्ही अंतर्गत लोकशाही मानतो. याउलट संघ आणि भाजपा शिस्तीचा बडगा उभारून विचारस्वातंत्र्य नष्ट करते, असे राहुल म्हणाले.