शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

देशावर संघाचा विचार लादण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 28, 2015 23:54 IST

मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीमोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली. मोदी सरकारने देश संघाच्या हवाली केला आहे. देशावर संघाची विचारधारा लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशात केवळ एकच व्यक्ती सर्वज्ञानी आहे. ही व्यक्ती स्वत:ला सर्व विषयातील जाणकार सांगून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.एनएसयूआयच्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात राहुल यांनी मोदी सरकारवर मोजून-मापून हल्ले केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काम करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले. पंतप्रधानांवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, पंतप्रधान चीन, जपान, अमेरिका, मंगोलिया फिरून आले. पण शेतकरी आणि मजुरांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही. एकीकडे मोदी शिक्षण व्यवस्था बळकट करण्याची भाषा करतात. दुसरीकडे देशाचे भविष्य असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये संघाची विचारधारा थोपण्याचे काम सुरू आहे. मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आहे. पण याचे परिणाम ‘शून्य’ येईल, हे मी आजच खात्रीपूर्वक सांगेल. कारण जनतेची भागीदारी गरजेची असताना मोदी सरकार केवळ निवडक उद्योगपतींना सोबत घेऊन हे काम करीतआहे. मोदी सरकारचे गत वर्षभरातील कामकाज याचा पुरावा आहे.४नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बुधवारच्या भेटीचा हवाला देत, राहुल गांधी यांनी मोदी यांना जोरदार टोला लगावला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त करताच, पंतप्रधान मोदी यांनी मनमोहनसिंगांना बोलावून घेत त्यांच्याकडून देशाची अर्थव्यवस्था कशी चालते याचे धडे घेतले, असे ते म्हणाले. ४संघाच्या शाखेत कुणालाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रांगेत उभे राहून सांगितले ते निमूटपणे करणे, एवढेच शाखेत करावे लागते. शिस्तीच्या नावावर व्यक्तीस्वातंत्र्य संपविण्यावर संघाचा विश्वास आहे. हीच विचारधारा देशावर लादण्याचे प्रयत्न भाजप व मोदी सरकार करीत आहे. काँग्रेसची विचारसरणी मात्र वेगळी आहे. येथे सगळ्यांचा आवाज ऐकला जातो. कारण हे काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये आहे. वेगवेगळी मते, विचारधारेचा काँग्रेस मेळ घालते. हीच काँग्रेसची शक्ती आहे. आम्ही अंतर्गत लोकशाही मानतो. याउलट संघ आणि भाजपा शिस्तीचा बडगा उभारून विचारस्वातंत्र्य नष्ट करते, असे राहुल म्हणाले.