शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

सरकारचा उद्योगपतींना लाभ देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:28 IST

मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ठेंगा दाखवून निवडक उद्योगपतींना मदत पोहचवित आहे

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ठेंगा दाखवून निवडक उद्योगपतींना मदत पोहचवित आहे. गुजरात उर्जा विकास महामंडळाकडून होणाऱ्या विजेच्या खरेदी कराराशी संबंधित दस्तऐवजांचा खुलासा काँग्रेसने बुधवारी केल्याने हे समोर आले.या दस्तऐवजांनुसार, फेब्रुवारी २००७ मध्ये गुजरात उर्जा विकास महामंडळाने अदानींच्या कंपनीकडून २००० मेगावॅट, टाटा कंपनीकडून १८०० मेगावॅट आणि एस्सार कंपनीकडून १००० मेगावॅट वीज खरेदीचा करार केला. याचा पुरवठा ग्राहकांना २.४० पैसे, २.८० पैसे प्रति यूनिट दराने केला जाईल. या कंपन्यांनी ग्राहकांना वीज पुरवठा सुरु केला. पाच वर्षांनंतर २०१२ मध्ये या कंपन्यांनी नियामक आयोगासमोर विनंती केली की, विजेचे ठरलेल्या दरात पुरवठा करणे शक्य नसल्याने तो बदलावा. २०१२ ते २०१७ मध्ये विविध आयोगांंसमोर हा मुद्दा वादाचा ठरला मात्र, ठोस निर्णय झाला नाही व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.न्यायालयाने ११ एप्रिल २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले की, वीज कंपन्यांनी सवलतींची मागणी केली आहे पण त्यांना कोणताही उचित आधार नाही. या कंपन्यांना पीपीए (पॉवर परचेज अ‍ॅग्रीमेंट) अंतर्गत वीज द्यावी लागेल. असे असतानाही गुजरात सरकारने यावर एका समितीची स्थापना केली.या राज्यांवर परिणामसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकार या उद्योगपतींच्या मदतीला आले. काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि शक्तिसिंह गोहिल यांनी असा आरोप केला आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या इशाºयावरुन वीज उत्पादन करणाºया या चार कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला करत गुजरात सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या कंपन्यांना कशा प्रकारे दिलासा दिला जाऊ शकतो याचा शोध घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकारcongressकाँग्रेस