शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
3
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
4
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
5
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
6
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
7
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
8
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
9
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
10
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
11
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
12
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
13
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
14
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
15
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
16
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
17
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
18
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
19
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
20
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा उद्योगपतींना लाभ देण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 05:28 IST

मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ठेंगा दाखवून निवडक उद्योगपतींना मदत पोहचवित आहे

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला ठेंगा दाखवून निवडक उद्योगपतींना मदत पोहचवित आहे. गुजरात उर्जा विकास महामंडळाकडून होणाऱ्या विजेच्या खरेदी कराराशी संबंधित दस्तऐवजांचा खुलासा काँग्रेसने बुधवारी केल्याने हे समोर आले.या दस्तऐवजांनुसार, फेब्रुवारी २००७ मध्ये गुजरात उर्जा विकास महामंडळाने अदानींच्या कंपनीकडून २००० मेगावॅट, टाटा कंपनीकडून १८०० मेगावॅट आणि एस्सार कंपनीकडून १००० मेगावॅट वीज खरेदीचा करार केला. याचा पुरवठा ग्राहकांना २.४० पैसे, २.८० पैसे प्रति यूनिट दराने केला जाईल. या कंपन्यांनी ग्राहकांना वीज पुरवठा सुरु केला. पाच वर्षांनंतर २०१२ मध्ये या कंपन्यांनी नियामक आयोगासमोर विनंती केली की, विजेचे ठरलेल्या दरात पुरवठा करणे शक्य नसल्याने तो बदलावा. २०१२ ते २०१७ मध्ये विविध आयोगांंसमोर हा मुद्दा वादाचा ठरला मात्र, ठोस निर्णय झाला नाही व प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.न्यायालयाने ११ एप्रिल २०१७ रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले की, वीज कंपन्यांनी सवलतींची मागणी केली आहे पण त्यांना कोणताही उचित आधार नाही. या कंपन्यांना पीपीए (पॉवर परचेज अ‍ॅग्रीमेंट) अंतर्गत वीज द्यावी लागेल. असे असतानाही गुजरात सरकारने यावर एका समितीची स्थापना केली.या राज्यांवर परिणामसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी सरकार या उद्योगपतींच्या मदतीला आले. काँग्रेसचे नेते जयराम रमेश आणि शक्तिसिंह गोहिल यांनी असा आरोप केला आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या इशाºयावरुन वीज उत्पादन करणाºया या चार कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला करत गुजरात सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. या कंपन्यांना कशा प्रकारे दिलासा दिला जाऊ शकतो याचा शोध घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकारcongressकाँग्रेस