शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 20:34 IST

'देशातील जनतेला खोट्या आश्वासनांच्या काँग्रेस पुरस्कृत संस्कृतीपासून सावध राहावे लागेल. '

PM Modi Attack On Congress: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खरपूस समाचार घेतला. खोटी आश्वासने देणे सोपे आहे, पण त्यांची योग्य अंमलबजावणी करणे अवघड किंवा अशक्य आहे, हे काँग्रेस पक्षाला चांगलेच समजले असेल, असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

पीएम मोदींचा हल्लाबोलपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (01 नोव्हेंबर) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कर्नाटक सरकारला दिलेल्या सूचनेवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, आता काँग्रेसचा पर्दाफाश झाला आहे. ते आश्वासने देत राहतात, परंतु त्यांना माहित आहे की, ते ते कधीही पूर्ण करू शकणार नाहीत. आता लोकांसमोर काँग्रेसचे सत्य उघड झाले आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणतात, आज काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणाकडे पाहा. विकासाचा वेग आणि आर्थिक परिस्थिती खराब होत चालली आहे. त्यांच्या तथाकथित हमी अपूर्ण राहिल्या आहेत. हा राज्यांतील जनतेचा घोर विश्वासघात आहे. 

पंतप्रधान मोदींनी सांगितले काँग्रेस कशी काम करते?पीएम मोदी इथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले, कर्नाटकमधील काँग्रेस पक्ष विकासाची कामे करण्याऐवजी पक्षांतर्गत राजकारण आणि लुटमारीत व्यस्त आहे. एवढेच नाही तर सध्याच्या योजनाही मागे घेणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. देशातील जनतेला खोट्या आश्वासनांच्या काँग्रेस पुरस्कृत संस्कृतीपासून सावध राहावे लागेल. हरयाणातील जनतेने त्यांचे खोटे कसे नाकारले आणि स्थिर, कृतीशील सरकारला प्राधान्य दिले, हे आपण अलीकडेच पाहिले, अशी बोचरी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली. 

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी कर्नाटकातील आपल्याच काँग्रेस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. सध्या कर्नाटकात ‘शक्ती योजने’वरुन मोठा गदारोळ सुरू झाला आहे. अनेक महिलांनी बसचे भाडे भरण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे सरकार या योजनेचा पुनर्विचार करेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केले. त्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांनी काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली. यावरुन खर्गे यांनीही कर्नाटक राज्य सरकारवर सडकून टीका केली. ‘जी आश्वासने पूर्ण करता येत नाहीत किंवा पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत राज्यावर आर्थिक बोजा पडतो, अशी कोणतीही आश्वासने निवडणुकीच्या काळात देऊ नयेत,’ असे खर्गे म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस