शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
5
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
6
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
7
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
8
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
9
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
10
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
11
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
12
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
13
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
14
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
15
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
16
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
17
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
18
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
19
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
20
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

टीआरएसला विजयाची खात्री; काँग्रेसला यशाचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 06:14 IST

एमआयएमचा केसीआरना पाठिंबा जाहीर; भाजपाही समर्थन देण्यास उत्सुक

हैदराबाद : सर्व एक्झिट पोलनी के. चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला असला तरी हैदराबादमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आकडे व टक्क्यांत थोडासा फरक झाला तरी टीआरएसचे सारे गणित बिघडू शकते. त्यामुळेच विजयाची खात्री व्यक्त करणारा हा पक्ष अद्याप काहीसा अस्वस्थ दिसत आहे. त्यामुळेच एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी सकाळी चंद्रशेखर राव यांना भेटून बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. भाजपाही राव यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. पण राव यांनी एमआयएमला जवळ करू नये, अशी भाजपाची अट आहे. भाजपापेक्षा एमआयएमचे अधिक आमदार निवडून येतील, अशी खात्री राव यांना असल्यामुळेच त्यांनी भाजपाला धुडकारून लावले आहे. आपल्याला भाजपाचा पाठिंबा नको, असे सांगतानाच, लोकसभा निवडणुकीतही आपला पक्ष भाजपाशी आघाडी करणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे.तेलंगणा विधानसभेची सदस्यसंख्या आहे ११९. त्यामुळे बहुमतासाठी ६0 जागा मिळणे आवश्यक आहे. गेल्या निवडणुकांत टीआरएसला ६३ म्हणजेच बहुमतापेक्षा तीनच जागा जादा मिळाल्या होत्या आणि एकूण मते मिळाली होती ३४ टक्के. याउलट काँग्रेसला २१ व तेलगू देसमला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यांची बेरीज बहुमतापेक्षा कमी म्हणजे ३६ असली तरी त्या दोन्ही पक्षांना मिळून मते मिळाली होती ४0 टक्के. आता हे दोन्ही पक्ष तसेच टीजेएस व सीपीआय यांची आघाडी आहे. आता त्यांची मते एखाद-दोन टक्क्याने वाढली आणि टीआरएसची मते आहे तशीच राहिली तरी काँग्रेसप्रणित आघाडीला बहुमत मिळू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.गेल्या निवडणुकांत चंद्रशेखर राव हिरो होते. पण चार वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने लोकांची काही प्रमाणात नाराजी आहे, असे गृहित धरले आणि त्याचा फटका बसला तर टीआरएसचे सारेच गणित बिघडू शकते. त्यामुळेच एक्झिट पोलचे निष्कर्ष काहीही असले तरी काँग्रेसला तेलंगणातही विजयाचा विश्वास दिसत आहे. त्यामुळेच टीआरएसमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. ती दूर करण्यासाठीच असदुद्दिन ओवेसी यांनी आज राव यांची भेट घेतली. या दोन्ही पक्षांना भाजपाची नव्हे, तर काँग्रेसचीच भीती आहे. तेलंगणात भाजपापेक्षा काँग्रेसच वाढण्याची शक्यता आहे, कारण भाजपाला फारशा जागा मिळणार नाहीत, असे बोलले जाते.त्यामुळे भाजपा राव यांना ‘किंग’ बनवण्यासाठी किंगमेकर बनू शकणार नाही, अशी चर्चा आहे. एमआयएमला जवळ करणार नसाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यायला तयार आहोत, असे भाजपाने म्हटले आहे. एमआयएमचा पाठिंबा घेऊ नही राव यांना आमदारांची गरज लागली तर भाजपा त्यांना मदत करणार का, हा सवाल आहे. तसे झाल्यास एमआयएम व भाजपा एकत्र आल्यासारखे दिसेल.गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी...काँग्रेस, तेलगू देसम, टीजेएस यांच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊ न आम्ही आघाडी करून निवडणूक लढवली असल्याने सर्वाधिक जागा मिळाल्यास आम्हालाच सत्तास्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी केली. स्पष्ट बहुमत कोणालाच नसल्यास राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल टीआरएसला बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोव्यात तसेच घडले होते.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018congressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनBJPभाजपा