शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयमध्ये कोणाचं असणार सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 7:27 AM

ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांत कोणत्या पक्षाचं सरकार बनणार ?, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे.

आगरताळा/कोहिमा/शिलाँग- ईशान्य भारतातल्या तीन राज्यांच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या राज्यांत कोणत्या पक्षाचं सरकार बनणार ?, या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळणार आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत तिन्ही राज्यांमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्रिपुरामध्ये सत्ताधारी सीपीएम आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार आहे. तर मेघालय आणि नागालँडमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं सर्व शक्ती पणाला लावली आहे. एक्झिट पोलनुसार, तिन्ही राज्यांत भाजपा घवघवीत यश मिळवून एक मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दोन एक्झिट पोलमध्ये कम्युनिस्टांकडे गेल्या 25 वर्षांपासून असलेली त्रिपुराची सत्ता भाजपा खेचून आणणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या राज्यातील निवडणूक निकालाचा देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्रिपुरात 18 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. तर नागालँड आणि मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. या तिन्ही राज्यांत विधानसभेच्या प्रत्येकी 60 जागा आहेत. परंतु काही कारणास्तव तिन्ही राज्यांत 59 जागांवरच मतदान झालं आहे. त्रिपुराच्या 59 विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी करण्यासाठी 20 ठिकाणी 59 मतमोजणी केंद्रे बनवण्यात आली आहेत. मतमोजणीदरम्यान व्हिडीओग्राफीसुद्धा करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी तपस रय यांनी दिली आहे. तर मेघालयचे निवडणूक आयुक्त एफ. आर. खारकोंगोर यांनी सांगितलं की, मतदान कक्षाच्या सुरक्षेसाठी केंद्रीय पॅरामिलिस्ट्री फोर्सला तैनात करण्यात आलं आहे. त्रिपुरावर सर्वांच्याच नजराया तिन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये त्रिपुराच्या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. इथं गेल्या 25 वर्षांपासून कम्युनिस्टांचं सरकार आहे. केरळ सोडल्यात कम्युनिस्टांचं सरकार फक्त त्रिपुरात आहे. यावेळी भाजपानं त्रिपुरा ताब्यात घेण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. एक्झिट पोलमधूनही भाजपाचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानात 92 टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केलं होतं. नागालँड ठरवणार पुढची दिशानागालँडमध्ये यावेळी निवडणुकीत अस्थिर वातावरण आहे. अनेक संघटनांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेसला सर्व 60 जागांवर उमेदवारही उभे करता आलेले नाहीत. भाजपाचा सहयोगी पक्ष एनपीपी दुरावला असून, भाजपानं इतर पक्षांसोबत युती केली आहे. मेघालयमध्ये काँग्रेसचा किल्ला वाचणार ?मेघालयमध्ये काँग्रेस बालेकिल्ला राखणार का, याकडे राजकीय वर्तुळातील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मेघालयमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास राज्यात पक्ष संपल्याचं चित्र उभं राहील. त्यामुळे भाजपाच्या काँग्रेसमुक्त भारताच्या दाव्याला आणखी मजबुती मिळणार आहे. काँग्रेसला या निवडणुकीत चांगलं यश मिळवावं लागणार आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूक