शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

“मोदींवर विश्वास ठेवला होता, BJP ला मदत करुन चूक केली”; पक्षाला रामराम करत नेत्याने केले मुंडन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 9:30 AM

भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले.

ठळक मुद्देपंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होताभाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणारलोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी विरोधकांचा मुख्य चेहरा असतील

कोलकाता: अलीकडेच भवानीपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपला चितपट करत मुख्यमंत्रीपद कायम राखले. या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या प्रियंका टिबरेवाल यांचा तब्बल ५८ हजार ८३२ मतांनी पराभव झाला. यानंतर आता भाजपचे त्रिपुरा येथील आमदार आशिष दास यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कौतुक करत आमदारकीचा राजीनामा देत असून, भाजपलाही रामराम करत असल्याचे जाहीर केले. भाजपवर दाखवलेल्या विश्वासाला तडा गेला असून, पश्चात्ताप म्हणून कालीघाट येथे दास यांनी मुंडनही केले. (tripura mla ashish das left the bjp party got his head shaved in kolkata as a remorse)

आगामी सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच विरोधकांचा मुख्य चेहरा असतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे, असे सांगत त्रिपुराचे भाजप आमदार आशिष दास यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगितले. तसेच अपेक्षाभंग झाला म्हणून आशिष दास यांनी कोलकाता येथील कालीघाट येथे मुंडन करून घेतले. काही दिवसांपूर्वी आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसच्या कोलकाता कार्यालयात जाऊन तृणमूल नेत्यांची भेट घेतली होती, असे सांगितले जात आहे. 

पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवला होता

कालीघाट खूपच अद्भूत आणि दिव्य स्थान आहे. येथे आलेल्या भाविकांची मनोकामना पूर्ण होते. पश्चात्ताप झाल्याने येथे मुंडन केले आहे. तसेच २०२३ मध्ये भाजप पराभूत होत नाही, तोपर्यंत असाच राहणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देत आहे. पुढील भूमिका आणि रणनीती लवकरच जाहीर करेन, असे आशिष दास यांनी म्हटले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता. गेली २५ वर्षे चाललेल्या कुशासनातून आम्हाला मुक्ती मिळेल, या अपेक्षेने भाजपला मतदान केले होते, सहकार्य केले. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडणून दिले होते. मात्र, आमच्याकडून चूक झाली, अशी टीका करत आशिष दास यांनी आमदारकी सोडत असल्याचे सांगितले. 

दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते नबेंदू भट्टाचार्य यांनी सांगितले की, यासंदर्भात कोणतीही टिपण्णी करणार नाही. पक्षनेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगितले. वास्तविक आशिष दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये सामील होत असल्याबाबत औपचारिक घोषणा केलेली नाही. मात्र, लवकरच ते तृणमूल पक्षात प्रवेश करतील, असा कयास बांधला जात आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाTripuraत्रिपुराTrinamool Congressतृणमूल काँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जी