शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:07 IST

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल

नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयकानं गुन्हेगारीकरणाला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवयाची आहेत की तोडायची आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाक दिल्यास पतीला थेट तुरुंगात टाकण्यात येईल. अशा परिस्थितीत तलाक देण्यात आलेली महिला काय खाणार, तिचा उदरनिर्वाह कसा चालणार, असे प्रश्न सुळे यांनी विचारले. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. सभागृहात उपस्थित असलेल्या २४५ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर ११ सदस्यांनी विरोधात मत नोंदवलं. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सरकारनं लोकसभेत विधेयक मंजूर केलं. पण राज्यसभेत सरकारला बहुमत नाही. इतकंच काय सध्या राज्यसभेचं कामकाज चालतही नाही. मग या विधेयकाचं रुपांतर कायद्यात कसं केलं जाणार?, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.तिहेरी तलाकच्या माध्यमातून गुन्हेगारीकरणात वाढ होईल, असा दावादेखील त्यांनी केला. एखाद्या पतीनं त्याच्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास तो गुन्हा ठरणार. त्यामुळे त्याची रवानगी थेट तुरुंगात केली जाणार. यानंतर त्या महिलेचं काय? तुरुंगात असलेला पती महिलेला भरपाई कशी काय देणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पती तुरुंगात गेल्यावर त्या महिलेनं काय करायचं असं म्हणत सुळे यांनी सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की मोडायची आहेत?, असा सवाल विचारला.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकSupriya Suleसुप्रिया सुळेlok sabhaलोकसभाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस