शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पारदर्शक निवड प्रक्रियेमुळे फडकला तिरंगा- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 5:22 AM

Independence Day : अनेक क्रीडा संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात आल्याने योग्य गुणवत्तेला संधी मिळाली. यामुळेच क्रीडाविश्वात तिरंगा फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : ‘विविध खेळांमधील संघ निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाल्याचा मोठा फायदा भारताला आहे. तसेच, अनेक क्रीडा संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात आल्याने योग्य गुणवत्तेला संधी मिळाली. यामुळेच क्रीडाविश्वात तिरंगा फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर मोदी यांनी आपल्या भाषणात क्रीडा क्षेत्रातील भारताच्या यशाचे कौतुक केले. मोदी यांनी म्हटले की, ‘घराणेशाहीचा नकारात्मक प्रभाव केवळ राजकारणापुरताच नव्हता, तर एकेकाळी हा प्रभाव क्रीडाक्षेत्रातही होता. आपण मागील काही दिवसांमध्ये खेळांमधील यश पाहिले.

याआधीही आपल्याकडे गुणवत्तेची कमतरता नव्हती. पण, त्यावेळी घराणेशाहीचा परिणाम भोगावा लागत होता. असे खेळाडू मैदानापर्यंत नक्की पोहोचत होते, पण त्यांना जय-पराजयाने काही फरक पडत नव्हता. अशा कठीण परिस्थितींशी सामना करत खेळाडूंना संपूर्ण आयुष्य झगडावे लागत होते. पण आता बदल झाला आहे आणि खेळाडू यशाचे शिखर गाठत आहेत. सुवर्ण आणि रौप्यची चमक आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावत आहेत.’

मोदी पुढे म्हणाले की, ‘जेव्हा पारदर्शकता आली, गुणवत्तेच्या आधारे खेळाडूंची निवड होऊ लागली, तेव्हा क्रीडाविश्वात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली. ही केवळ सुरुवात आहे आणि येथे भारत थकणार किंवा थांबणार नाही. ते दिवस आता दूर नाहीत, जेव्हा आपण खूप सारे सुवर्ण पटकावू.’

‘टॉप्स’ ठरले निर्णायकगेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने विक्रमी ७ पदकांची कमाई करताना एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी २२ सुवर्ण पदकांसह एकूण ६१ पदके पटकावली. विशेष म्हणजे खेळाडूंना मदत म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकारणाच्या (साइ) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना (टॉप्स) निर्णायक योजना ठरली. यामुळे अनेक खेळाडूंना सरावासाठी विदेशात जाण्यासाठी आर्थिक मदत मिळाली. वर्षभर साइद्वारे खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवली जाते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिन