शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगा अन् शिवशक्ती! चंद्रयान ३ लँडिंगसोबत चंद्रयान २ च्या पदचिन्हाच्या जागेचेही नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 09:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भावूक होत, इस्रोच्या प्रमुखांची गळाभेट घेतली आणि तुम्हा सर्वांना सॅल्यूट करायचे आहे, असे म्हटले. यानंतर मोदींनी चंद्रयान ३ मोहिमेची माहिती घेत शास्त्रज्ञांना संबोधित केले. यावेळी मोदींनी चंद्रयान २ आणि ३ चे लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणांना नावे जाहीर केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची भेट घेतली आणि चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन केले. इस्रोच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींना चांद्रयान-3 मोहिमेची माहिती देण्यात आली. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी पंतप्रधान मोदींना संपूर्ण मिशनची माहिती दिली. 

चांद्रयान-३ च्या लँडिंगवेळी मी दक्षिण आफ्रिकेत होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्या यशाकडे होते. मी तुम्हाला नमस्कार करायला आलो आहे. मला तुम्हा सर्वांना बघायचे होते. मी तुम्हा सर्वांना सलाम करू इच्छितो, असे पंतप्रधान मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना म्हणाले. यावेळी पंतप्रधान मोदी भावूक झाले होते.

आणखी एक नामकरण प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहे. चार वर्षांपूर्वी जेव्हा चंद्रयान-2 चंद्राजवळ पोहोचले होते. जिथे त्याच्या पावलांचे ठसे पडले होते. त्याला नाव देण्याचे ठरविले होते. परंतू, ती परिस्थिती पाहता आम्ही ठरवलं होतं की चांद्रयान-३ यशस्वीरीत्या जेव्हा पोहोचेल तेव्हाच आम्ही दोन्ही चंद्रयान मोहिमांची नावे देऊ. त्यामुळे ज्या ठिकाणी चांद्रयान-2 ने पाऊल टाकले आहे, त्या जागेला आता तिरंगा पॉइंट म्हटले जाईल, असे मोदी म्हणाले. 

चांद्रयान-३ च्या लँडरने अंगदप्रमाणे आपला पाय रोवला आहे. एका बाजूला विक्रमचा विश्वास आहे. दुसऱ्या बाजूला प्रज्ञानचा पराक्रम आहे. लाखो वर्षांमध्ये प्रथमच पृथ्वीवरील मानव चंद्राची दुसरी बाजू पाहत आहे. हे चित्र जगाला दाखवण्याचे काम भारताने केले आहे. तुम्ही सर्व शास्त्रज्ञांनी हे केले आहे. यामुळे चंद्राचे रहस्य उलगडेल, पृथ्वीवरील आव्हाने सोडवण्यातही मदत होईल, असे मोदी म्हणाले. 

प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यश मिळतेच. आज भारत हा चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करणारा जगातील चौथा देश बनला आहे. भारताचा प्रवास कुठून सुरू झाला हे पाहिल्यावर हे यश आणखी मोठे होते. तिसऱ्या जगात म्हणजेच तिसऱ्या रांगेत उभ्या असलेल्या लोकांमध्ये आपली गणना होत होती. तिथून बाहेर पडल्यानंतर आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारताची गणना पहिल्या रांगेत होत आहे. या प्रवासात इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे. तुम्ही मेक इन इंडियाला आज चंद्रावर नेले आहे, अशा शब्दांत मोदी यांनी स्तुती केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीisroइस्रोChandrayaan-3चंद्रयान-3Chandrayaan 2चांद्रयान-2