शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आता मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त १० तासांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 06:48 IST

एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य, साडेसहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास १५ ऐवजी १० तासांत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात या संदर्भातील प्रकल्पांना मान्यता मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्ग एकूण १ हजार ४८३ किमी इतका आहे. यासाठी सध्या १५ तासांचा अवधी लागतो. मात्र हे अंतर १० तासांत पार करता यावे यासाठी एक्स्प्रेस १३० ऐवजी ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी ६ हजार ८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी या पैशांचा वापर होईल.यासह नवी दिल्ली ते हावडा एक्स्प्रेस १ हजार ५२५ किमीचे अंतर पार करण्यासाठी १७ तासांऐवजी १५ तासांचा कालावधी लागावा यावरही रेल्वे प्रशासन काम करत आहे. यासाठी ६ हजार ६८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर ४ वर्षांत काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.देशातील ५० स्थानकांचा पुनर्विकासदेशातील ५० स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. देशातील प्रत्येक मेल, एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनुदानासह किंवा विनाअनुदान तिकीट काढण्याची सोय उपलब्ध असेल. याबाबत रेल्वे प्रशासन जागृती करणार असून मेल, एक्स्प्रेसमध्ये लोको पायलटसाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था केली जाईल.६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफायसध्या देशातील १ हजार ६०३ रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित ४ हजार ८८२ रेल्वे स्थानकांवर वायफाय बसविण्यात येतील. त्यामुळे पुढील १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय असेल.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस