शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

आता मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त १० तासांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 06:48 IST

एक्स्प्रेस ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य, साडेसहा हजार कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा प्रवास १५ ऐवजी १० तासांत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे लक्ष्य आहे. मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी पुढील १०० दिवसांतील कृती आराखड्यात या संदर्भातील प्रकल्पांना मान्यता मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे.पश्चिम रेल्वे मार्गावरून मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्ग एकूण १ हजार ४८३ किमी इतका आहे. यासाठी सध्या १५ तासांचा अवधी लागतो. मात्र हे अंतर १० तासांत पार करता यावे यासाठी एक्स्प्रेस १३० ऐवजी ताशी १६० किमी वेगाने चालविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी ६ हजार ८०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी या पैशांचा वापर होईल.यासह नवी दिल्ली ते हावडा एक्स्प्रेस १ हजार ५२५ किमीचे अंतर पार करण्यासाठी १७ तासांऐवजी १५ तासांचा कालावधी लागावा यावरही रेल्वे प्रशासन काम करत आहे. यासाठी ६ हजार ६८४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यानंतर ४ वर्षांत काम पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाला आहे.देशातील ५० स्थानकांचा पुनर्विकासदेशातील ५० स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. देशातील प्रत्येक मेल, एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील आहे. भारतीय रेल्वेमध्ये अनुदानासह किंवा विनाअनुदान तिकीट काढण्याची सोय उपलब्ध असेल. याबाबत रेल्वे प्रशासन जागृती करणार असून मेल, एक्स्प्रेसमध्ये लोको पायलटसाठी अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्था केली जाईल.६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफायसध्या देशातील १ हजार ६०३ रेल्वे स्थानकांवर वायफायची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित ४ हजार ८८२ रेल्वे स्थानकांवर वायफाय बसविण्यात येतील. त्यामुळे पुढील १०० दिवसांच्या कृती आराखड्यात ६ हजार ४८५ रेल्वे स्थानकांवर वायफाय असेल.

टॅग्स :Rajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस