शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ऑक्टोबर महिन्यापासून दहा रूपयांनी महाग होणार दिल्ली मेट्रोचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 12:58 PM

गांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे.

ठळक मुद्देगांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 ऑक्टोबरपासून तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दुसऱ्या पर्वातील भाडेवाढ ही 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

नवी दिल्ली- गांधी जयंतीनंतर दिल्ली मेट्रोतून प्रवास तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. दिल्ली मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 3 ऑक्टोबरपासून तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या वर्षी मे महिन्यात मेट्रोच्या तिकीट दरात वाढ केली होती. मे महिन्यात केलेली वाढ 10 मेपासून लागू करण्यात आली. आता दुसऱ्या पर्वातील भाडेवाढ ही 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 

मेट्रो रेल्वेच्या तिकिटांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. पण त्याचा भार सर्वसामान्य लोकांवर 3 ऑक्टोबरपासून पडेल. 1 ऑक्टोबरला रविवार आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीची सुट्टी आहे. त्यामुळे तीन तारखेपासून मेट्रोने प्रवास करताना प्रवाशांना वाढल्याला किंमतीचं तिकीट काढावं लागणार आहे. मेट्रोने प्रवास करतान सुरूवातीच्या पाच किलोमीटर अंतरासाठी ही भाडेवाढ नसेल पण त्याच्या पुढील स्लॅबसाठी दहा रूपये जास्त द्यावे लागणार आहेत.

मे महिन्यात तिकिटाचे दर वाढविल्यानंतर मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचं दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आलं. जून 2016 मध्ये मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्या ही या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत जास्त होती. मेमध्ये मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या घटल्याचा डीएमआरसीचा अंदाज आहे. मेट्रो तिकिटांचे दर वाढविल्याने प्रवाशांची संख्या घटेल याची चिंता नसल्याचं डीएमआरसीचं म्हणणं आहे. यावर्षी मे महिन्यात मेट्रोच्या तिकीट दरात वाढ झाली होती, त्याआधी 2009 तिकीट किंमतीत वाढ झाली होती. विजेच्या खर्चासह वाढत्या ऑपरेटिंग खर्चामुळे डीएमआरसीकडून तिकीट दरात वाढ केल्याची मागणी केली होती. 

स्टाफ, ऊर्जा आणि रिपेयरिंग खर्चासाठी मेट्रोच्या तिकीट दरात वाढ करणं गरजेचं असल्याचं डीएमआरसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.