शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

सिग्नल ओव्हरशूट-मानवी त्रुटीमुळे ट्रेनची धडक, अपघातामागचे रेल्वेने सांगितले कारण; आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 08:45 IST

आंध्र प्रदेशात रविवारी संध्याकाळी उशिरा झालेल्या रेल्वे अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी बालासोर येथे मोठा रेल्वेअपघात झाला, या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला.  काल रविवारी रात्री आंध्रप्रदेशमध्ये आणखी एक रेल्वे अपघात झाला. यात १३ जणांचा मृ्त्यू झाल्याचे समोर आले आहे. तर ५४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या अपघाताचे कारण आता रेल्वेने दिले आहे. 

तीनशे लोकल रद्द, उद्रेकाची भीती; पश्चिम रेल्वेने इतर यंत्रणांना विश्वासात न घेताच केले नियोजन

जियानगरम जिल्ह्यातील हावडा-चेन्नई मार्गावर एका ट्रेनने सिग्नल ओलांडल्यानंतर आणि दुसऱ्या ट्रेनला धडकल्यानंतर अनेक डबे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळी ७ च्या सुमारास झाला, तिथे ०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेन आणि ०८५०४ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल यांच्यात धडक झाली. ईस्ट कोस्ट रेल्वेने सांगितले की, आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात दोन गाड्यांची टक्कर मानवी चुकांमुळे झाली असावी. मुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजीत साहू म्हणाले, "विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने सिग्नलचे 'ओव्हरशूटिंग' केले होते. त्यामुळे दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या.

अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी,  जेव्हा एखादी ट्रेन रेड सिग्नलवर थांबण्याऐवजी पुढे जाते तेव्हा असे घडते. अपघातामुळे विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे (ट्रेन क्रमांक ०८५३२) मागील दोन डबे आणि विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरचे लोको कोच (ट्रेन क्रमांक ०८५०४) रुळावरून घसरले.

मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून शक्य तितक्या रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जखमींना उपचार मिळावेत यासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना आरोग्य, पोलिस आणि महसूल यासह अन्य सरकारी विभागांशी समन्वय साधून तातडीने मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले आणि जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळतील याची खात्री केली.

या अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाने काही हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. बीएसएनएल क्रमांक ०८९१२७४६३३० ०८९१२७४४६१९ एअरटेल सिम ८१०६०५३०५१ ८१०६०५३०५२ बीएसएनएल सिम ८५००४१६७० ८५००४१६७१. या अपघात आंध्रप्रेदशातील मृतांना १० लाखांची मदत आणि इतर राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत. तर  गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघात