शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हरला डुलकी लागली अन्... कार दरीत कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, १५० किमीच्या वेगात होती गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:10 IST

मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात एकाचवेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

MP Accident: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाल. रतलाम जिल्ह्यातील रावटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमपुरा गावाजवळ माही नदीच्या पुलाजवळ महिंद्रा XUV 700 ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याचे रेलिंग तोडून थेट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सकाळी सुमारे ७.३० वाजता MH03 EL 1388 या नोंदणी क्रमांकाची कार दिल्लीहून मुंबईकडे जात असताना ही दुर्घटना घडली.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालवणाऱ्या दुराज (वय ३५) याला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक संदीप पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच्या अगदी १० फूट अंतरावर स्पीड गन लावलेली आहे. या 'स्पीड गन'च्या तपासणीतून असे स्पष्ट झाले आहे की, अपघाताच्या वेळी या कारचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड होता. याच अतिवेगामुळे गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.

अपघातात मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींमध्ये १५ वर्षांचा एक मुलगा आणि ६० वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ यांचा समावेश आहे. मृतांमध्ये चार जण मुंबईचे आणि एक जण गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी आहे. दानिश उस्मान चौधरी (वडोदरा), गुलाम रसूल चौधरी (वय ७०), खालिद गुलाम चौधरी, गुलाम मोइद्दीन चौधरी (वय १५), दुराज (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पाचही जणांचा मृत्यू जागीच झाला असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला असून, त्यांची ओळख पटवण्यासाठी काही नातेवाईक रतलाम येथे येत आहेत.

पुण्यात नवले पुलावर मृत्यूचे तांडव

दरम्यान, गुरुवारी पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Driver dozes off, car falls into valley: 5 dead

Web Summary : Five died on Delhi-Mumbai Expressway as a speeding car crashed into a valley near Ratlam after the driver fell asleep. The car was travelling at 150 kmph. Separately, a truck accident on Navale Bridge in Pune killed nine.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघात