शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हरला डुलकी लागली अन्... कार दरीत कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, १५० किमीच्या वेगात होती गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:10 IST

मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात एकाचवेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

MP Accident: दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाल. रतलाम जिल्ह्यातील रावटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमपुरा गावाजवळ माही नदीच्या पुलाजवळ महिंद्रा XUV 700 ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याचे रेलिंग तोडून थेट दरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सकाळी सुमारे ७.३० वाजता MH03 EL 1388 या नोंदणी क्रमांकाची कार दिल्लीहून मुंबईकडे जात असताना ही दुर्घटना घडली.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कार चालवणाऱ्या दुराज (वय ३५) याला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे संचालक संदीप पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अपघात झाला, त्याच्या अगदी १० फूट अंतरावर स्पीड गन लावलेली आहे. या 'स्पीड गन'च्या तपासणीतून असे स्पष्ट झाले आहे की, अपघाताच्या वेळी या कारचा वेग सुमारे १५० किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड होता. याच अतिवेगामुळे गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही.

अपघातात मृत्यू झालेल्या पाच व्यक्तींमध्ये १५ वर्षांचा एक मुलगा आणि ६० वर्षांचे एक वृद्ध गृहस्थ यांचा समावेश आहे. मृतांमध्ये चार जण मुंबईचे आणि एक जण गुजरातच्या वडोदरा येथील रहिवासी आहे. दानिश उस्मान चौधरी (वडोदरा), गुलाम रसूल चौधरी (वय ७०), खालिद गुलाम चौधरी, गुलाम मोइद्दीन चौधरी (वय १५), दुराज (वय ३५) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील पाचही जणांचा मृत्यू जागीच झाला असून, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रतलाम मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला असून, त्यांची ओळख पटवण्यासाठी काही नातेवाईक रतलाम येथे येत आहेत.

पुण्यात नवले पुलावर मृत्यूचे तांडव

दरम्यान, गुरुवारी पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातास जबाबदार असलेल्या ट्रक चालकासह तिघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अपघातास जबाबदार असणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनरचा होरपळून मृत्यू झाला. साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या कंटेनरने १० ते १२ वाहनांना धडक दिल्यामुळे लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ ते १० जण गंभीररित्या जखमी झाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Driver dozes off, car falls into valley: 5 dead

Web Summary : Five died on Delhi-Mumbai Expressway as a speeding car crashed into a valley near Ratlam after the driver fell asleep. The car was travelling at 150 kmph. Separately, a truck accident on Navale Bridge in Pune killed nine.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAccidentअपघात