शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिपायाच्या जागेसाठी तब्बल 3 हजार 700 पीएचडीधारकांनी केला अर्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 14:04 IST

पात्रतेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अशी बेरोजगार मंडळी तुलनेने कमी पात्रतेचे काम करण्यासाठीही तयार होत आहेत.

लखनौ -  पात्रतेप्रमाणे नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे अशी बेरोजगार मंडळी तुलनेने कमी पात्रतेचे काम करण्यासाठीही तयार होत आहेत. असाच प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथे शिपायाच्या पदासाठी निघालेल्या 62 जागांसाठी हजारो अर्ज आले आहेत. त्यामधील सुमारे 3 हजार 700 अर्ज तर पीएचडी धारकांनी केले आहेत.  शिपाई/संदेशवाहकांच्या पदासाठीची पात्रता केवळ पाचवी पास आहे. मात्र असे असताना उनेक उच्चशिक्षितांनी या पदासाठी अर्ज केला आहे. 62 जागांसाठई एकूण 93 हजार अर्ज आले आहेत. त्यामधील केवळ 7 हजार 400 अर्जदारांचे शिक्षण पाचवी ते 12वीच्या दरम्यान आहे. उर्वरित अर्जधारकांमध्ये पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर तसेच बी. टेक, एम. टेक आणि एमबीए केलेल्या तरुणांचा समावेश आहे. पोलीस खात्यांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिपाई/संदेशवाहकाची 62 पदे गेल्या 12 वर्षांपासून रिक्त आहेत. पोलीस खात्यातील या पदाचे काम पोस्टमनसारखे असते. या पदावरील नियुक्त व्यक्ती पोलिसांसाठी टेलिकॉम डिपार्टमेंटमधून पत्र आणि कागदपत्रे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात पोहोचवण्याचे काम करतात. आता पर्यंत निवड करण्यासाठी आम्ही अर्जदारांकडून त्यांना सायकल चालवता येत असल्याचे सत्यापन करून घेत होते. मात्रा यावेळा मोठ्या प्रमाणावर उच्चशिक्षितांनी अर्ज केल्याने आम्हाला नाइलाजाने निवड चाचणी घ्यावी लागणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.   

टॅग्स :jobनोकरीUttar Pradeshउत्तर प्रदेशEmployeeकर्मचारी