शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
3
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
4
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
5
₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
6
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
7
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
8
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
9
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
10
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
11
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
12
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
13
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
14
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
15
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
16
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
17
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
18
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
19
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
20
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी

आसाममध्ये पुरामुळे १३४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:04 IST

आसाममध्ये गेल्या बारा तासांत पुराने आणखी दहा जणांचा जीव घेतला असल्यामुळे गेल्या एप्रिलपासून पुरात मरण पावलेल्यांची संख्या १३४ झाली आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या बारा तासांत पुराने आणखी दहा जणांचा जीव घेतला असल्यामुळे गेल्या एप्रिलपासून पुरात मरण पावलेल्यांची संख्या १३४ झाली आहे. नद्या भरभरून वाहिल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर जमीन जलमय झाल्यामुळे हे बळी गेले.दहा आॅगस्टपासून नव्याने पूर यायला सुरवात होऊन त्यात ४९ लोक मरण पावले, असे अधिकाºयांनी बुधवारी सांगितले. राज्यातील ब्रह्मपुत्रा, धनसिरी, जिया भराली, कोपिली, बेकी आणि कुशियाला या प्रमुख अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर वाहात असल्याचे राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकरणच्या अधिकाºयांनी सांगितले. आसाममध्ये पुराच्या आलेल्या दुसºया लाटेने ४८१ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या प्रसिद्ध काझिरंगा नॅशनल पार्कचा ८० टक्के भाग पाण्यात बुडाला असून सात गेंड्यांसह १४० वन्यप्राणी मरण पावले आहेत. आसाममधील हा यावर्षीचा दुसरा पूर आहे. दोन्ही पुरांमध्ये मिळून राज्यात ३00 हून अधिक वन्यप्राणी मरण पावले आहेत. रोजच्या रोज जनावरांचे मृतदेह सापडत आहे. तिथे १0 आॅगस्टपासून सात गेंडे, १२२ दलदलीत राहणारी हरणे, दोन हत्ती, तीन जंगली डुकरे, दोन हरणे, तीन सांभार, म्हैस आणि एक साळिंदर मरण पावले आहे. (वृत्तसंस्था)>प्राण्यांची वाताहतसातपैकी सहा गेंडे पुरात बुडाले, तर एक नैसर्गिक कारणांनी मरण पावला. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी १0 आॅगस्ट रोजी डिफ्लू नदीच्या माध्यमातून काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये शिरले. या पार्कचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात झालेला आहे.पाण्यात अडकलेले प्राणी वाचवण्याचे व मृतदेह मिळवण्याचे आणि कितीप्रकारचे प्राणी पाण्यात अडकून पडले आहेत किंवा मरण पावले आहेत, त्याची माहिती पार्कचे संरक्षक, टास्क फोर्स, प्रोटेक्शन फोर्स व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून घेतली जात आहे.आसामच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेटआसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ न, त्यांना राज्यातील गंभीर पूरपरिस्थितीची माहिती दिली.आसामसाठी आर्थिक मदत देण्याचे देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी पुरोहित यांना दिले.