शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आसाममध्ये पुरामुळे १३४ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:04 IST

आसाममध्ये गेल्या बारा तासांत पुराने आणखी दहा जणांचा जीव घेतला असल्यामुळे गेल्या एप्रिलपासून पुरात मरण पावलेल्यांची संख्या १३४ झाली आहे.

गुवाहाटी : आसाममध्ये गेल्या बारा तासांत पुराने आणखी दहा जणांचा जीव घेतला असल्यामुळे गेल्या एप्रिलपासून पुरात मरण पावलेल्यांची संख्या १३४ झाली आहे. नद्या भरभरून वाहिल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर जमीन जलमय झाल्यामुळे हे बळी गेले.दहा आॅगस्टपासून नव्याने पूर यायला सुरवात होऊन त्यात ४९ लोक मरण पावले, असे अधिकाºयांनी बुधवारी सांगितले. राज्यातील ब्रह्मपुत्रा, धनसिरी, जिया भराली, कोपिली, बेकी आणि कुशियाला या प्रमुख अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर वाहात असल्याचे राज्याच्या नैसर्गिक आपत्ती निवारण प्राधिकरणच्या अधिकाºयांनी सांगितले. आसाममध्ये पुराच्या आलेल्या दुसºया लाटेने ४८१ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या प्रसिद्ध काझिरंगा नॅशनल पार्कचा ८० टक्के भाग पाण्यात बुडाला असून सात गेंड्यांसह १४० वन्यप्राणी मरण पावले आहेत. आसाममधील हा यावर्षीचा दुसरा पूर आहे. दोन्ही पुरांमध्ये मिळून राज्यात ३00 हून अधिक वन्यप्राणी मरण पावले आहेत. रोजच्या रोज जनावरांचे मृतदेह सापडत आहे. तिथे १0 आॅगस्टपासून सात गेंडे, १२२ दलदलीत राहणारी हरणे, दोन हत्ती, तीन जंगली डुकरे, दोन हरणे, तीन सांभार, म्हैस आणि एक साळिंदर मरण पावले आहे. (वृत्तसंस्था)>प्राण्यांची वाताहतसातपैकी सहा गेंडे पुरात बुडाले, तर एक नैसर्गिक कारणांनी मरण पावला. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी १0 आॅगस्ट रोजी डिफ्लू नदीच्या माध्यमातून काझिरंगा नॅशनल पार्कमध्ये शिरले. या पार्कचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात झालेला आहे.पाण्यात अडकलेले प्राणी वाचवण्याचे व मृतदेह मिळवण्याचे आणि कितीप्रकारचे प्राणी पाण्यात अडकून पडले आहेत किंवा मरण पावले आहेत, त्याची माहिती पार्कचे संरक्षक, टास्क फोर्स, प्रोटेक्शन फोर्स व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून घेतली जात आहे.आसामच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेटआसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ न, त्यांना राज्यातील गंभीर पूरपरिस्थितीची माहिती दिली.आसामसाठी आर्थिक मदत देण्याचे देण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी पुरोहित यांना दिले.