शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

आधी शौचालय, मग देवालय! मोदी यांचा मंत्र, देश स्वच्छ ठेवणाºयांनाच वंदे मातरम्चा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:02 IST

‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे. देश स्वच्छ ठेवणारेच लोक खºया अर्थाने भारतमातेचे सुपुत्र आहेत, असेही त्यांनी बोलून दाखविले.स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व पं. दीनदयाळ उपाध्याय शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोदी म्हणाले की, इथे प्रवेश करताच मला वंदे मातरमच्या घोषणा ऐकू आल्या.पण देशवासीयांना मी विचारू इच्छितो की, आपणास वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे का?माझे बोलणे जिव्हारी लागेल. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारतो आणि नंतर वंदे मातरम् म्हणतो, हेयोग्य आहे का?एकविसाव्या शतकातील भारत उभा करण्यासाठी सज्ज राहा, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, आझाद, विवेकानंद, सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी तयार राहा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानममता, शहा यांची आदरांजलीकोलकाता : विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वामी विवेकानंदांना सोमवारी आदरांजली अर्पण केली. अमित शहा यांनी सोमवारी विवेकानंद यांच्या घरी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.गंगेच्या स्वच्छतेबाबत विचार करतो का?मोदी म्हणाले की, गंगेत डुबकी मारल्याने पापे धुतली जातात, असा समज आहे. आपल्या पालकांना गंगास्नान घडवावे, असे अनेक जण विचार करतात. पण गंगेच्या स्वच्छतेबाबत कोणी विचार करतो का? स्वामी विवेकानंद आज जिवंत असते, तर त्यांना हे खचितच आवडले नसते. मोठी रुग्णालये व डॉक्टर्स यांच्यामुळे आपण निरोगी राहतो. पण सफाई कामगार देश स्वच्छ ठेवतात, याचाही विचार व्हायला हवा. धर्म व परंपरांचा पगडा असलेल्या देशातून आलेल्या स्वामी विवेकानंदांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढायलाही कमी केले नाही, याची आठवण मोदींनी करून दिली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात गुरू शोधण्याऐवजी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतStudentविद्यार्थी