शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
5
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
6
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
7
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
9
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
10
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
11
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
12
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
13
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
14
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
15
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
16
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
17
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
18
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
19
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
20
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी शौचालय, मग देवालय! मोदी यांचा मंत्र, देश स्वच्छ ठेवणाºयांनाच वंदे मातरम्चा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:02 IST

‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे. देश स्वच्छ ठेवणारेच लोक खºया अर्थाने भारतमातेचे सुपुत्र आहेत, असेही त्यांनी बोलून दाखविले.स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व पं. दीनदयाळ उपाध्याय शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोदी म्हणाले की, इथे प्रवेश करताच मला वंदे मातरमच्या घोषणा ऐकू आल्या.पण देशवासीयांना मी विचारू इच्छितो की, आपणास वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे का?माझे बोलणे जिव्हारी लागेल. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारतो आणि नंतर वंदे मातरम् म्हणतो, हेयोग्य आहे का?एकविसाव्या शतकातील भारत उभा करण्यासाठी सज्ज राहा, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, आझाद, विवेकानंद, सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी तयार राहा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानममता, शहा यांची आदरांजलीकोलकाता : विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वामी विवेकानंदांना सोमवारी आदरांजली अर्पण केली. अमित शहा यांनी सोमवारी विवेकानंद यांच्या घरी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.गंगेच्या स्वच्छतेबाबत विचार करतो का?मोदी म्हणाले की, गंगेत डुबकी मारल्याने पापे धुतली जातात, असा समज आहे. आपल्या पालकांना गंगास्नान घडवावे, असे अनेक जण विचार करतात. पण गंगेच्या स्वच्छतेबाबत कोणी विचार करतो का? स्वामी विवेकानंद आज जिवंत असते, तर त्यांना हे खचितच आवडले नसते. मोठी रुग्णालये व डॉक्टर्स यांच्यामुळे आपण निरोगी राहतो. पण सफाई कामगार देश स्वच्छ ठेवतात, याचाही विचार व्हायला हवा. धर्म व परंपरांचा पगडा असलेल्या देशातून आलेल्या स्वामी विवेकानंदांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढायलाही कमी केले नाही, याची आठवण मोदींनी करून दिली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात गुरू शोधण्याऐवजी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतStudentविद्यार्थी