शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

आधी शौचालय, मग देवालय! मोदी यांचा मंत्र, देश स्वच्छ ठेवणाºयांनाच वंदे मातरम्चा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 04:02 IST

‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘भारतात आधी शौचालय, मग देवालय’ हा विचार रुजायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पान खाऊन आजूबाजूला थुंकणा-या लोकांना सोमवारी चांगलेच फटकारले. अशा लोकांना नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांनाच या देशात वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे. देश स्वच्छ ठेवणारेच लोक खºया अर्थाने भारतमातेचे सुपुत्र आहेत, असेही त्यांनी बोलून दाखविले.स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोमधील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व पं. दीनदयाळ उपाध्याय शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मोदी म्हणाले की, इथे प्रवेश करताच मला वंदे मातरमच्या घोषणा ऐकू आल्या.पण देशवासीयांना मी विचारू इच्छितो की, आपणास वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार आहे का?माझे बोलणे जिव्हारी लागेल. पान खाऊन भारतमातेवर पिचकारी मारतो आणि नंतर वंदे मातरम् म्हणतो, हेयोग्य आहे का?एकविसाव्या शतकातील भारत उभा करण्यासाठी सज्ज राहा, महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, आझाद, विवेकानंद, सुभाषचंद्र बोस यांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी तयार राहा.- नरेंद्र मोदी, पंतप्रधानममता, शहा यांची आदरांजलीकोलकाता : विवेकानंद यांच्या शिकागोतील भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वामी विवेकानंदांना सोमवारी आदरांजली अर्पण केली. अमित शहा यांनी सोमवारी विवेकानंद यांच्या घरी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली.गंगेच्या स्वच्छतेबाबत विचार करतो का?मोदी म्हणाले की, गंगेत डुबकी मारल्याने पापे धुतली जातात, असा समज आहे. आपल्या पालकांना गंगास्नान घडवावे, असे अनेक जण विचार करतात. पण गंगेच्या स्वच्छतेबाबत कोणी विचार करतो का? स्वामी विवेकानंद आज जिवंत असते, तर त्यांना हे खचितच आवडले नसते. मोठी रुग्णालये व डॉक्टर्स यांच्यामुळे आपण निरोगी राहतो. पण सफाई कामगार देश स्वच्छ ठेवतात, याचाही विचार व्हायला हवा. धर्म व परंपरांचा पगडा असलेल्या देशातून आलेल्या स्वामी विवेकानंदांनी समाजातील अनिष्ट प्रथांवर कोरडे ओढायलाही कमी केले नाही, याची आठवण मोदींनी करून दिली. स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात गुरू शोधण्याऐवजी सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतStudentविद्यार्थी